नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी ची घटना तेवढीच द्वापरयुगातल्या कृष्णलिलेशी निगडीत आहे.
वराह अवतार प्रसंगी पृथ्वीचा उद्धार श्री भगवान विष्णु यांनी केला. आणि त्याच पृथ्वीच्या गर्भात ज्या ठिकाणी जानकी माता ( सीता ) यांचा जन्म झाला त्याच ठिकाणी नरकासुराचा जन्म झाला. जनक राजा यांनी सोळा वर्षे त्याचा संभाळ केला नंतर पृथ्वी माता नरकासुराला घेऊन गेली पुढे भगवान विष्णु यांनी त्याला प्राग्ज्योतीषपुरचा राजा बनविले .विदर्भ नगरीची राजकुमारी माया हिच्या बरोबर त्याचा विवाह झाला.त्यावेळी विष्णु भगवंताने दुर्भेथ नावाचा रथ भेट दिला.
नरकासुराला संगती फार वाईट लागली, वाईट राक्षसांची मैत्री झाली तो दुष्ट बनला. या मुळे वशिष्ट ऋषी यांनी त्याला तु भगवान विष्णु यांच्या हातून मरण पावशील असा शाप दिला. त्याने आपल्या तप सामर्थ्यच्या बलावर ब्रम्हदेवांना प्रसन्न केले व वर मागून घेतला की देवता असुर राक्षस आदी मला मारू शकत नाहीत.
असा वर प्राप्त करून घेतला.
हयग्रीव,सुंद यांच्या मदतीने देवराज इंद्र आदि देवगनांना त्रास देण्यास सुरवात केली, इंद्रावर विजय प्राप्त केला, वरुणाची छत्री, आदितीचे कुंडल घेऊन पळाला फार अत्याचार करू लागला.
शेवट इंद्र देवाने भगवान विष्णु कड़े धाव घेतली आणि सर्व सवीस्तर सांगितले . त्यावेळी भगवान विष्णु यांनी सुदर्शन चक्राने नरकासुराचे दोन टुकडे केले वध केला.
तो आजचा दिवस पृथ्वी दुभंग पावली आणि नरकासुराला आपल्या गर्भात घेतले आणि भगवान विष्णु यांस म्हणाली वराह अवताराच्या वेळी मला आपला स्पर्श झाला त्या वेळी नरकासुराचा जन्म झाला आज त्याचा शेवटही आपल्याच हातून झाला .
वराह अवतार प्रसंगी पृथ्वीचा उद्धार श्री भगवान विष्णु यांनी केला. आणि त्याच पृथ्वीच्या गर्भात ज्या ठिकाणी जानकी माता ( सीता ) यांचा जन्म झाला त्याच ठिकाणी नरकासुराचा जन्म झाला. जनक राजा यांनी सोळा वर्षे त्याचा संभाळ केला नंतर पृथ्वी माता नरकासुराला घेऊन गेली पुढे भगवान विष्णु यांनी त्याला प्राग्ज्योतीषपुरचा राजा बनविले .विदर्भ नगरीची राजकुमारी माया हिच्या बरोबर त्याचा विवाह झाला.त्यावेळी विष्णु भगवंताने दुर्भेथ नावाचा रथ भेट दिला.
नरकासुराला संगती फार वाईट लागली, वाईट राक्षसांची मैत्री झाली तो दुष्ट बनला. या मुळे वशिष्ट ऋषी यांनी त्याला तु भगवान विष्णु यांच्या हातून मरण पावशील असा शाप दिला. त्याने आपल्या तप सामर्थ्यच्या बलावर ब्रम्हदेवांना प्रसन्न केले व वर मागून घेतला की देवता असुर राक्षस आदी मला मारू शकत नाहीत.
असा वर प्राप्त करून घेतला.
हयग्रीव,सुंद यांच्या मदतीने देवराज इंद्र आदि देवगनांना त्रास देण्यास सुरवात केली, इंद्रावर विजय प्राप्त केला, वरुणाची छत्री, आदितीचे कुंडल घेऊन पळाला फार अत्याचार करू लागला.
शेवट इंद्र देवाने भगवान विष्णु कड़े धाव घेतली आणि सर्व सवीस्तर सांगितले . त्यावेळी भगवान विष्णु यांनी सुदर्शन चक्राने नरकासुराचे दोन टुकडे केले वध केला.
तो आजचा दिवस पृथ्वी दुभंग पावली आणि नरकासुराला आपल्या गर्भात घेतले आणि भगवान विष्णु यांस म्हणाली वराह अवताराच्या वेळी मला आपला स्पर्श झाला त्या वेळी नरकासुराचा जन्म झाला आज त्याचा शेवटही आपल्याच हातून झाला .
कारण त्या युगात ह्याच दिवशी दुष्ट,व्यभिचारी व अत्याचारी राक्षस नरकासुराच्या नरक यातनेतून संपूर्ण मानवजातीची सुटका झाल्याने, भुलोकी श्रीकृष्णासहीत अगदी सर्वच लोकांनी पहाटे सूर्योदया पूर्वी अभ्यंग स्नान करुन, नववस्त्रे परिधान करून, हर्षोल्हासात शोभेची दारु उडवून, आनंदाने दिपोत्सव साजरा केलेला दिवस म्हणजे आजच्या अश्विन मासे चतुर्दशीचा दिवस, जो त्या घटनेच्या स्मरणार्थ आजही तितक्याच प्रेरणेने अखंड भारतात सर्वच भारतीयांकडून परंपरागत अगदी तशाच प्रकारे पूर्वापार साजरा केला जातो हे खरचं विशेष व उल्लेखनीय होय.
ह्याच दिवशी श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामा च्या मदतीने नरकासुराचा निःपात करुन त्याच्या बंदीवासात अडकलेल्या सोळा हजार एकशे तरुण स्त्रीयांची मुक्तता करुन त्यांना सामाजिक मानसन्मान मिळण्यासाठी त्यांनी त्या सर्वांशी विवाह करुन त्यांचा उध्दार केला होता. अशा प्रकारे त्या काळात स्त्रीयांप्रती श्रीकृष्णांनी दाखविलेली उदारता व महानतेचे स्मरण म्हणून ही आजची चतुर्दशी सर्वच स्त्रीवर्गातही अगदी आत्मियतेने साजरी केली जाते.
आणि खरोखरच धर्मशास्त्रा नुसार दरवर्षी आजच्या दिवशी पहाटेच्या वातावरणात पृथ्वीतलावर कृष्णलहरी जास्त क्षमतेने कार्यरत असल्यामुळे आज पहाटेचे सूर्योदयपूर्व आपण उरकलेले अभ्यंग स्नान व औक्षण संपूर्ण वर्षभरात आपल्या तब्येतीला अतिशय प्रभावी व परिणामकारक ठरणार आणि तसेच कोणत्याही नरक त्रासातून आपण सही-सलामत सुटणार ह्याची खात्री बाळगा आणि आनंदाने म्हणा,
आली माझ्या घरीही दिवाळी.
आली माझ्या घरीही दिवाळी.
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
No comments:
Post a Comment