˙˙जय मुक्ताई ..

Friday, 28 October 2016

विठोबाचे राज्य आम्हा

विठोबाचे राज्य आम्हा
द्वापारयुगात भगवान श्रीकृष्णाचे प्राकट्य झाल्यापासून 
आश्विन वद्य द्वादशीला गाई-वासराची मिळुन पुजन करण्याची प्रथा सुरू झाली
या दिवशी सांजवेळी गाई-वासरांना ओवाळतात
आजच्या दिवशी
त्यांना सुग्रास चारा खायला दिला जातो
आज गाई-वासरांना ओवाळण्यासाठी पितळाची निरंजनी वा आरती नसते
तर
मोळ नावाच्या गवताची एक कण्याची तिन टोकाची आरती बनवून तिने ओवाळतात
दुसरे दिवशी दोन कण्याची आरती
तिसरे दिवशी तिन कण्याची आरती
चौथे दिवशी चार कण्याची आरती

दिवाळीच्या पाड़व्याला पाच कण्याची आरती करून या पाचही दिवस गाई-वासरांना ओवाळतात


ओवाळताना
दिन् दिन् दिवाळी!गाई म्हशी ओवाळी!!
गाई म्हशी कोणाच्या बळीरामाच्या
दे आई खोबरेची वाटी!नाहीतर घालिन पाठित काठी!!
अशी आजच्या दिवशी ओवाळण्याची परंपरा आहे
तसे पाहिले तर आज एकादशी आहे
परंतु
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या सखोल माहितीवरून तिथीचा क्षय झालेमुळे आज एकादशीलाच द्वादशी पण आलीय अशी माहिती मिळाली आहे
आपण त्या तिथीच्या भानगडीत पड़त नाही
असो
वारकरी मड़ंळीना शक्यतो पंचांगाची कधि जरूर हि पड़त नाही
कारण
आज एकादशी असो वा त्रयोदशी असो?
हरिदासांना तर
*विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिवाळी*
चला मग आपनही कुठे कमी नाहीच
आता गाईच नाही राहिल्या तर वासर कुठून आणायचे?
आजवर दिवेच लावत आलोय
आज या महापर्वावर लावु दिवे मग?
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment