˙˙जय मुक्ताई ..

Friday, 28 October 2016

याजसाठी केला होता अट्टाहास

याजसाठी केला होता अट्टाहास।
शेवटचा दिस गोड व्हावा।
     मनुष्याचा संपूर्ण दिवसभराचा व्यवहार आणि आजन्म प्रवास चाललेला असतो तो कशासाठी ? दिवसभर चाललेल्या या आटाआटीचा काय हेतु ? कशासाठी एवढा व्याप,धावपळ काबाडकष्ट ? तर शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून हे सर्व करावयाचे.आयुष्यभर कडू विष पचवायचें कां ? तर ती शेवटची घडी,तें मरण पवित्र व्हावें म्हणून.ज्याप्रमाणे दिवसाचा शेवटचा क्षण सायंकाळी येतो आजच्या दिवसाचे संपूर्ण कर्म जर पवित्र भावनेने केलेले असेल तर रात्रीची प्रार्थना गोड होईल.तो दिवसाचा शेवटचा क्षण जर गोड झाला तर ते त्या दिवसाचे कर्म सफल झाले.

तेव्हा मनाची एकाग्रता होईल.प्रत्येक दिवस अंतिम म्हणून जगता आला,पाहिजे प्रत्येक गोष्ट,छोट्यातली छोटी बाब सुद्धा प्रामाणिकपणे व्हायला हवी.आनंद देत वाटचाल सुरू हवी.म्हणजे झोपताना लागलेली निद्रा ही गोड असेल.तिला उद्याचं माहीतच नसत.
अस जगता आल तर नक्कीच शेवटचा दिवस गोड..
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment