प्रेम
मित्रांनो, प्रेम तुम्हांला खुणावील तेव्हा त्याच्या मागून चालू लागा. त्याच्या वाटा खडतर चढणीच्या असतील प्रेमाने तुमच्यावर पाखर घातली म्हणजे त्याला शरण जा.त्याच्या पंखात पोलादी पाती लपली असतील ती तुम्हांला जखमी करतील.प्रेम तुमच्याशी संवाद करील त्यावेळी त्यावर विश्वास ठेवा.भयाण येणारा वारा जसा बगिचा उद्धवस्त करतो तसा प्रेमाचा स्वर तुमची स्वप्ने उधळून लावील.कारण प्रेम तुम्हांला जस राजवैभव देईल तस सुळावरही नेईल.तुमच्या अंतकरणाच्या उंचीला ते पोहचेल, सूर्यप्रकाशात थरथर नाजूक डहाळ्याना कुरवाळील.तस ते तुमच्या मुळापर्यंत जाईल आणि गदगदून तुमची मनोभुमी थरकापिवील.धान्यांचे पांचुदे बांधावे तासे ते तुम्हांला आवळून धरील.झोडपून तुम्हांला नागव करील,दळून काढील,पीठ करील तीबींल तुम्हांला खिळखिळे करील.मग ते तुम्हांला ईश्वरी ज्वालेच्या निखाऱ्याशी नेईल तेव्हाच त्याच्या पावन भोजनाचे तुम्ही खाद्यान्न तुम्ही व्हाल.हे सगळ प्रेम कशासाठी करील ? तर त्यामुळेच तुमच्याच अंतःकरणाची रहस्ये तुम्हाला उमगतील.आणि त्याच जाणिवेने ईश्वरी चैतन्याचा एक अंश तुम्ही होऊन जावं पण जीवलगानों भयाच्या आहारी जाऊन प्रेमाकडून शांतीचीच आणि सुखाची आकांक्षा कराल तर आपले नागवेपण झाकून प्रेमाच्या यातनाघराकडे तुम्ही पाठ फिरवावी हेच बरं.मग जग ऋतूरंगहीन होऊन जाईल.तुम्ही हसाल पण त्यात तुमचं सुखसर्वस्व नसेल.तुम्ही रडाल पण त्यात तुमच दुःखसर्वस्व नसेल.प्रेम काय देत तर केवळ स्वतंःचच दान देत प्रेम काय नेत ?
तर केवळ स्वतःलाच विन्मुख करतं.प्रेम तुम्हांला झडपणार नाही की स्वतःही झडपणार नाही कारण प्रेम स्वयंपूर्ण आणि स्वयंतृप्त आहे.प्रेम करताना तुम्ही म्हणू नका की,ईश्वर माझ्या हृदयात आहे,म्हणा मी ईश्वराच्या हृदयात वस्तीला आहे.कधीही मनात आणू नका की प्रेमाचा मार्ग मी आखून काढील,तुम्ही पात्र असाल तर प्रेमच तुम्हांला मार्गदर्शन करत जाईल.आपण सिद्धिस जावं ही एकच ईच्छा प्रेमाला असते.प्रेम करत असताना इच्छा आणि वासना तुमच्यापाशी असतील तर त्या कशा असाव्यात वितळलेल्या बर्फाच्या वाहत्या झऱ्याने रात्रीच्या प्रहराला गाणी ऐकवावीत तशी तुमची इच्छा असावी.नितांत कोमल संवेदनाने होणार दुःख तुम्ही जाणून घ्याव अशी इच्छा असावी.स्वतःमधील प्रेम जाणीवेने जखमी व्हावं स्वेच्छा रक्त व्हावू द्यावं आणि त्याचा आनंद मानावा अशी तुमची इच्छा असावी.पंख फाकलेल्या चित्तानं पहाटेची जाग यावी.आणि प्रेमपूजनासाठी नवा दिवस उगवला याबद्दल तुम्ही ईश्वराचे आभार मानावे.दुपारच्या निवांत समयी प्रेमाच्या निर्भरतेच चिंतन घडावं.आणि कृतज्ञ अंतकरणाने तुम्ही सांयकाळी घराकडे परतावं हृदयस्थ प्रेयसीसाठी प्रार्थना करीत.स्तवनगीत ओठावर घोळवीत तुम्ही झोपेकडे वळावं.आणि नितांत प्रेमाच्या कुशीत विसावं.
जय मुक्ताई
संग्रहीत चिंतन एका महात्म्याच्या अॉडिओतून.
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
मित्रांनो, प्रेम तुम्हांला खुणावील तेव्हा त्याच्या मागून चालू लागा. त्याच्या वाटा खडतर चढणीच्या असतील प्रेमाने तुमच्यावर पाखर घातली म्हणजे त्याला शरण जा.त्याच्या पंखात पोलादी पाती लपली असतील ती तुम्हांला जखमी करतील.प्रेम तुमच्याशी संवाद करील त्यावेळी त्यावर विश्वास ठेवा.भयाण येणारा वारा जसा बगिचा उद्धवस्त करतो तसा प्रेमाचा स्वर तुमची स्वप्ने उधळून लावील.कारण प्रेम तुम्हांला जस राजवैभव देईल तस सुळावरही नेईल.तुमच्या अंतकरणाच्या उंचीला ते पोहचेल, सूर्यप्रकाशात थरथर नाजूक डहाळ्याना कुरवाळील.तस ते तुमच्या मुळापर्यंत जाईल आणि गदगदून तुमची मनोभुमी थरकापिवील.धान्यांचे पांचुदे बांधावे तासे ते तुम्हांला आवळून धरील.झोडपून तुम्हांला नागव करील,दळून काढील,पीठ करील तीबींल तुम्हांला खिळखिळे करील.मग ते तुम्हांला ईश्वरी ज्वालेच्या निखाऱ्याशी नेईल तेव्हाच त्याच्या पावन भोजनाचे तुम्ही खाद्यान्न तुम्ही व्हाल.हे सगळ प्रेम कशासाठी करील ? तर त्यामुळेच तुमच्याच अंतःकरणाची रहस्ये तुम्हाला उमगतील.आणि त्याच जाणिवेने ईश्वरी चैतन्याचा एक अंश तुम्ही होऊन जावं पण जीवलगानों भयाच्या आहारी जाऊन प्रेमाकडून शांतीचीच आणि सुखाची आकांक्षा कराल तर आपले नागवेपण झाकून प्रेमाच्या यातनाघराकडे तुम्ही पाठ फिरवावी हेच बरं.मग जग ऋतूरंगहीन होऊन जाईल.तुम्ही हसाल पण त्यात तुमचं सुखसर्वस्व नसेल.तुम्ही रडाल पण त्यात तुमच दुःखसर्वस्व नसेल.प्रेम काय देत तर केवळ स्वतंःचच दान देत प्रेम काय नेत ?
तर केवळ स्वतःलाच विन्मुख करतं.प्रेम तुम्हांला झडपणार नाही की स्वतःही झडपणार नाही कारण प्रेम स्वयंपूर्ण आणि स्वयंतृप्त आहे.प्रेम करताना तुम्ही म्हणू नका की,ईश्वर माझ्या हृदयात आहे,म्हणा मी ईश्वराच्या हृदयात वस्तीला आहे.कधीही मनात आणू नका की प्रेमाचा मार्ग मी आखून काढील,तुम्ही पात्र असाल तर प्रेमच तुम्हांला मार्गदर्शन करत जाईल.आपण सिद्धिस जावं ही एकच ईच्छा प्रेमाला असते.प्रेम करत असताना इच्छा आणि वासना तुमच्यापाशी असतील तर त्या कशा असाव्यात वितळलेल्या बर्फाच्या वाहत्या झऱ्याने रात्रीच्या प्रहराला गाणी ऐकवावीत तशी तुमची इच्छा असावी.नितांत कोमल संवेदनाने होणार दुःख तुम्ही जाणून घ्याव अशी इच्छा असावी.स्वतःमधील प्रेम जाणीवेने जखमी व्हावं स्वेच्छा रक्त व्हावू द्यावं आणि त्याचा आनंद मानावा अशी तुमची इच्छा असावी.पंख फाकलेल्या चित्तानं पहाटेची जाग यावी.आणि प्रेमपूजनासाठी नवा दिवस उगवला याबद्दल तुम्ही ईश्वराचे आभार मानावे.दुपारच्या निवांत समयी प्रेमाच्या निर्भरतेच चिंतन घडावं.आणि कृतज्ञ अंतकरणाने तुम्ही सांयकाळी घराकडे परतावं हृदयस्थ प्रेयसीसाठी प्रार्थना करीत.स्तवनगीत ओठावर घोळवीत तुम्ही झोपेकडे वळावं.आणि नितांत प्रेमाच्या कुशीत विसावं.
जय मुक्ताई
संग्रहीत चिंतन एका महात्म्याच्या अॉडिओतून.
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
No comments:
Post a Comment