˙˙जय मुक्ताई ..

Friday, 28 October 2016

समर्थाचियें पंगती भोजनें....

🌺|| ते हे माय ज्ञानेश्वरी ||
माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत कुठही अर्जुनाला काहीच कळत नव्हते किंवा तो आत्मज्ञानसंपन्न झाला नव्हता असे म्हटलेल नाही. अर्जुनाचा अधिकार फार मोठा आहे,
परिसनयाच्या राया |
ऐके बा धनजंया ||
आता पर्यंत जितके ऐकणारे झाले त्यांचा अर्जुन राजा आहे. माऊलीनी अर्जुनास आत्मचर्चेच्या संदर्भात पार्थ असे संबोधले आहे. कारण तो नुसता पृथ्वीचा पार्थ नाही तर पृथ्वीची व्यापकता व सोशीकता त्याच्या व्यक्तीत्वात आहे. म्हणून तो पार्थ.
पार्थ कसा आहे तर तो पार्थासारखाच आहे. तो कोणत्याही विषेशनाच्या घरट्यात बसनारा नाहीये. महाकाव्याच्या घाटावरून फिरनारा तर मुळीच नाहीये. कल्पनाच्या पंखावर बसून उगाचच स्वैर भराऱ्या मारून डोऴे दिपवनारा तर मुळीच नाहीये. तो आपल्या जाणीवा प्रामाणिकपने तपासनारा नितळ साधक आहे. युद्ध हे त्याचे फक्त निमित्त असावे. त्याच्या जिवनातील संघर्ष फार वेगळा आहे. जो आजही तुमच्या माझ्यात नित्य सुरू आहे. तो म्हणजे कोणत्या वेळी नेमके काय करायचे. म्हणून तो आपल्या देहालाच कुरूक्षेत्र समजतो. सैन्यालाच विकार समजतो. धृतराष्ट्राला विषयात बघतो. याचे निमित्त आपण आहे याचे त्याला भान आहे. परंतु निमित्त हेच सर्वस्व मानल्याने पार्थाची मुळची जागा हरवली. त्याच्या आत्मरूपापासुन तो वेगळा पङला. या वेगळे पनास तो सर्वस्व मानु लागला. यामुळे त्याचे आत्त्मभानच हरवुन बसला. यासाठी भगवंताला अर्जुनास अठरा अध्यायाची अठरा योग सागायंची उचित वेळ आली ति कुरूक्षेत्रावर.

देखा नवल तया प्रभूचें |
प्रेम अद्भुत भक्तांचे |
जे सारथ्य पार्थाचें |
करीतु असे ||
जेणे गीता उपदेशीली |
किंवा
अर्जुना सकंट पङता जडभारी |
गीता सांगे हरि कुरूक्षेत्री ||
तोची अवतार धरी अंलकापुरी |
ज्ञानाबाई सुदंरी तारावया ||
काल च्या चिंतनाने ते हे माय ज्ञानेश्वरी अध्याय ६ "आत्मसंयम योग" पुर्ण झाला आज रमा एकादशी च्या शुभदिनी ७ वा अध्यायास "ज्ञान विज्ञान योग" सुरवात करुया.
आपल्याला फक्त ऐकच करायचय,
"वाचावी ज्ञानेश्वरी"
कारण
समर्थाचियें पंगती भोजनें |
तळिल्या वरील्या एकचि पक्वान्नें |
तेवीं श्रवणें अर्थें पठणें |
मोक्षुचि लाभे ||
जय जय मुक्ताई👏👏👏
https://www.facebook.com/te.he.mai.dnyaneshwari/

No comments:

Post a Comment