˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

मन

मन
जेव्हा आपन म्हणतो आपल्याला आपल मन कळलय तेव्हा ते खऱ्या अर्थान समजलेलं नसत
तरीही आपन त्याला भुलतो
संत,शास्त्र,नीती सर्वच सांगुन दमले तरी मनामागे जाणारा माणूस अजुन थांबलेला नाही
मन आपल्यामागेय का आपन मनाच्या मागे आहोत कि आपनच मन आहोत
यात सामान्य माणुस लक्षच घालत नाही
जागेपणी धावणं तर चालूच असत
पण स्वप्नातही धावणं बंद नसत
स्वप्नात सर्वकाही आपनच असतो
बाहेरच्यांना तिथ प्रवेशच नाही
स्वप्नात आपनच आपल्याला सुख-दु:ख देत असतो
हेच आपल रोजचचं जीवनय
यात काही बदल होत नाही
असं काऽ
मनाला शत्रु मानाव की मित्र हे अनिर्णित आहे
वाईट माणूस हा शरीराने वाईट नसतो किंवा चांगला माणुस हा स्वर्गातुन शरीर घेवुन आलेला नसतो
त्याचं मन कसयं यावर ते मुल्यांकन ठरत असत..
सर्वशास्त्रसंपन्न सोन्याचं घर असणारा रावण व कंदमुळे खाऊन जीवन व्यतीत करणारे ऋषिमुनि यात आदरणीय कोनाला मानणारऽ
आजही तसचयं सर्वसाधनसंपत्ती असलेले लोक तर एकीकडे लेखक,विचारवंत
यात मान कोणालाय हे काही वेगळ सांगायला नकोय
याच मुळ कारण मनच
पहिल्यांदा मनात संकल्प येतो मग इंद्रियातुन क्रिया होते
मन जागेवर नसेल तर योग्य प्रतिक्रिया उमटत नाही
परमात्म्याच्या सृष्टीबरोबर मन ही आपली सृष्टी निर्माण करते
या सृष्टीचे आयुष्य अल्प असले तरी निर्मिती चालुच असते
माऊली म्हणतात..
संकल्पे सृष्टी घडी।सवेचि विकल्पुनि मोडी।
मनोरथांच्या उतरंडी।उतरी रची॥
मन कस आहे व केवढय हे पाहता नाही येत उलट याला फिरण्यास त्रैलोक्यही कमी पडत
मन बुद्धीचा द्वेष करते व निश्चयालाही उधळुन लावते..
मनाबद्दल कितीही विचार केला तर मन हे शेवटी मनच आहे
मनामुळ आलेल्या संकटांना तोंड
देत पुढे सरकत असतो
मन प्रसन्न राहणे महत्वाचे आहे
कारण मानसिक ताण अनेक रोगांना जन्म देत असतो
चुचकारून का होईना मनाला चांगल शिकवणं हे आपल्या हातात आहे
मन चांगल असेल..
तरच परमार्थही साध्य होन्यास वेळ लागनार नाही
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment