तुळसी विवाह
🌹🌹🌹🌹🌹
तुळसीचे पान । एक त्रैलोक्या समान ।। १।।
उठोनियां प्रातःकाळी । वंदी तुळसी माऊली ।।२।।
मनीचें मनोरथ । पुरती हेंचि सत्य ।।३।।
तुलशीचें चरणीं । शरण एका जनार्दनीं ।।४।।
उठोनियां प्रातःकाळी । वंदी तुळसी माऊली ।।२।।
मनीचें मनोरथ । पुरती हेंचि सत्य ।।३।।
तुलशीचें चरणीं । शरण एका जनार्दनीं ।।४।।
अशाप्रकारे संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.एकंदरीत भारतीय समाजात तुळस या वनस्पतीला मानाचेस्थान आहे. समुद्रमंथनातून जेंव्हा अमृत निघाले तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. प्रत्येकाच्या दारी तुळशीवृंदावन असतेच. नित्य नियमाने तिची पूजा केली जाते सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते देवळात परमेश्वराला तुळशीपत्र वाहिले जाते. पूजाविधी मध्ये एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्याऐवजी तुळशीचे पान वाहिले जाते. श्रीकृष्णाला तुळस अत्यंत प्रिय असे मानले जाते. पंढरपूरच्या विठोबाची पूजा करताना त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे असेही मानले जाते. सत्यनारायणाच्या पूजेत एक हजार तुळशीपत्रे वाहिली जातात. कोणालाही दान देताना तुळशीपत्र वाहून ते दिले जाते. देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीचे एक पान नैवेद्यावर ठेवून तुळशीच्या दुसर्या पानाने नैवेद्य दाखवला जातो व नंतर ते पान देवाला वाहिले जाते.हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यु झालातर त्या मृतदेहाच्या तोंडात, देहावर, कपाळपट्टीवर आणि दोन्ही कानांवर तुलसीपत्र ठेवले जाते.भारतीय समाजात तुळशीला एवढे मानाचे स्थान देण्याचे कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे. ती आपल्या उच्छवासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते, त्यामुळे हवा शुद्ध रहाते ती कफनाशक व पाचक आहे सर्दी, पडसे, कफ, खोकला, दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे. तुळशीची पाने, आले व गूळ पाण्यात उकळवून हा काढा केला जातो. चहा कॉफी ऐवजी तो पिणे अधिक चांगले तुळशीची पाने जेवल्यानंतर चावून खाल्यास पचन चांगले होते. तुळशीरस नियमित सेवन केल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते. रक्तातील, कोलस्ट्रोल कमी होते. कोलायटिस, अंग दुखणे, सर्दी पडसे, पांढरे कोड , मेदवृद्धी, डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे. उचकी लागल्यास तुळशीची पाने खावीत स्मरणशक्ती वाढवण्यास तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या मंजिऱ्या म्हणजे तुळशीची फुले त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. त्याचे पाणी, दुध, साखर एकत्र करून प्यायल्यास लघवी स्वच्छ होते.वृंदावनी, विश्वपूजिता, पुष्पसारा, कृष्णजीवनी अषा नावांनी ओळखली जाणारी तुळस ही एक झुडुपवजा वनस्पती आहे. ती तीन ते चार फूट इतकी उंच वाढू शकते. त्याला एक विशिष्ट सुगंध असतो. या रोपट्यावर भ्रमर झेपावत नाहीत ,फुलपाखरे भिरभिरत नाहीत आणि पाखरे आपली घरटी बांधत नहीत. पांढरी तुळस आणि कृष्णतुळस असे याचे दोन प्रकार आहेत.त्यापैकी कृष्णतुळस औषधी असते.तुळशीचे औषधी गुण आणि धार्मिक भाव यामुळे वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे आपण वारकरी आहोत, विठोबाबद्दल आपल्याला आस्था आहे हे दाखवण्यासाठी वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळशीच्या वाळलेल्यालाकडाचे मणी ओवून ही माळ बनवली जाते. आपल्या आराध्यदेवतेचा नामोच्चार व जप करण्याचे एक साधन म्हणूनही त्याचा वापर केला जातो.
*तुलसी विवाह* :-
कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीविवाह केला जातो .काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात.नित्यनेमाने त्याला पाणी घालून वाढवतात. मग तिचा विवाह लावतात. या विवाहात तुळस ही वधू, बाळकृष्ण वर, आणि ऊस हा मामा असे मानले जाते.त्यासाठी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशीभोवती रांगोळी काढतात. तुळशीच्या चारही बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव तयार करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची ,फुले, चिंचा, आवळे ठेवतात. तुळशीच्यासमोर पाटावर तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. संध्यकाळी सूर्य मावळल्यावर कृष्णाबरोबर अंतरपाट, मंगलाष्टक, मणीमंगळसूत्र, ओटीचे सामान या साहित्यासमवेत सर्व विवाहविधीनुसार तुळशीचे लग्न लावले जाते.यासंबंधी एक कथा सांगितली जाते ती पुढील प्रमाणे जालंधर नावाचा राजा प्रजेला खूप त्रास देत असे. त्याची पत्नी वृंदा ही प्रतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्यपुण्यामुळे विष्णूला जालंधराला मारणे अवघड होऊन बसले. तेव्हा श्रीविष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदेच्या पातिव्रत्याचा भंग केला. त्यामुळे त्याला जालंधराचा वध करता आला.हे सर्व वृंदेला समजताच तिने विष्णूला शाप दिला. .व ती स्वत; सती गेली. तिच्या मृत्युच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली, तीच तुळस . म्हणून विष्णूला तुळस प्रिय असते. अशीही एक कथा सांगण्यात येते.पुढे द्वापार युगात याच वृंदेने रुक्मिणी होऊन कृष्णाशी कार्तिक शुद्ध द्वादशीला लग्न लावले. त्यावेळेपासूनतुलसीविवाहास प्रारंभ झाला असे मानतात.
.तुलसी स्तोत्र :-
तुलसी सर्व प्रतांना महापातक नाशिनी |अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय सम ||सत्ये सत्यवतीचैव त्रेतया मानवी तथा |द्वापारे चावतीर्णासि वृंदात्व तुलसी क्ली: ।।
.तुलसी स्तोत्र :-
तुलसी सर्व प्रतांना महापातक नाशिनी |अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय सम ||सत्ये सत्यवतीचैव त्रेतया मानवी तथा |द्वापारे चावतीर्णासि वृंदात्व तुलसी क्ली: ।।
No comments:
Post a Comment