ऐसा पुरूषार्थी अगस्ती
पौराणिक काळातील महान तपस्वी महर्षी वशिष्ठांचे बंधू विद्यं पर्वताचे गुरू अगस्त्यजी असल्याचा उल्लेख महाभारतात आला आहे. प्राचिन काळी मेरू पर्वत हा सर्व पर्वतांमध्ये उत्तुंग पर्वत म्हणून गणला जात असे. त्यांची उंच उंच शिखरे पाहून विद्य॔पर्वत स्वताची उंची मेरू पर्वतापेक्षा आधिक वाढवण्याची जणू स्पर्धाच लागली. यामुळे सुर्य गमनामध्ये बांधा येत कालगणनेतही अंतर पड़ू लागले. उंचीच्या अभिमानही विद्यंपर्वतास दिवसेंदिवस वाढतच होता. तेंव्हा सर्व देविदेवतांनी अगस्तजींना विनंती केली. महर्षी अगस्त्यजी दक्षिण दिशेस गमन करत असताना विद्यं पर्वत अगस्त्यजींना वंदन करण्यासाठी आड़वा झाला व महर्षीना मार्ग मोकळा करुन दिला. महर्षीनी पुन्हा परत येईपर्यंत "जैसा आहे तैसा"
रहाण्याची आज्ञा केली, परंतू महर्षी अगस्त्यजी पुन्हा त्या मार्गांनी न आल्याने आजही तो पर्वत आड़वाच आहे. ऋषिचे उपकार म्हणून दक्षिण देशासाठी आजही संपर्क होतोय.
भगवान शकंराच्या वरदान प्राप्तीने आतापी, वातापी व इल्वल हे तिन महाबलशाली दैत्य आपल्या आसुरी शक्तीच्या सामर्थ्यावर सर्वांचा कपटाने छळ करू लागले.
आतापी वातापी इल्वल |
तिघे दैत्य परम सबळ |
शिववरे महाखळ |
कापट्य सकळ जाणती ||
या महादैत्यांनी देवी देवता वगैरे कुणालाही आपल्या कपटातून सोड़ले नाही. हे आपल्या मायावी शक्तीने,
अन्नरूप होय एक |
दुजा निजांगे होय उदक |
एक अन्नदाता देख |
होऊनी बैसे वनातंरी ||
या तिघांपैकी एकाने अनछत्र माड़ायंच
एकान अन्न बनवायचे व एकाने पाणी बनायचे
असे हे महामायावी दैत्य होते. यांनी एकदा अगस्त्य ऋषीला आपल्या मायेने अन्न खायला दिले अन्न बनून एक भाऊ ऋषिच्या पोटात गेला पण म्हणतात,
हरिचीया भक्ता |नाही भय चिंता ||
अथवा
तुका म्हणे पोटी साठवीला देव |
ज्या भक्तांने देवच आपल्या पोटात साठवीला आहे त्याला राक्षस वा विषारी अन्नही काय करणार? नियोजित ठरल्याप्रमाणे मोठ्याभावाने अन्न बनून ऋषींच्या पोटात गेलेल्या भावाला हाक मारली. येरवी तो विषारी अन्नही बनून पोटात गेलेला पोट फोड़ून बाहेर यायचा. महर्षी अगस्त्यजींनी आपल्या पोटावरून योगसामर्थ्याने हात फिरवताच तो आतल्या आत पोटातच भस्म झाला.
उदरावरी फिरवून हस्तगत |
दैत्य भस्म केला पोटात ||
बरेचदा आपल्या भावाला आवाज दिला परंतू तो बाहेर येईना तेव्हा,
तव दोघे रूप धरिती थोर |
महाविक्राळ भयंकर |
धावले सत्वर |
ऋषीवरी ||
तेव्हा महर्षी अगस्त्यजींनी वातापीला एक बाण मारला तर त्याचे शिर आकाशात उड़ून गेले.
आपल्या दोन्हीही भावांचा मृत्यू झालेला बघून
दोघे निमाले देखोन |
इल्वल पळाला तेथुन |
तव तो घटोद्वव क्रोधायमान |
पाठी लागला तयाचे ||
अगस्त्यजी त्याच्या पाठिमागे धनुष्य बान घेऊन लागले सपुंर्ण भुमंड़ळात फिरला. परंतु,
पाठ न सोड़ी अगस्ती |
तव तो होऊनी कापट्यगती |
समुद्रजळी मिसळला ||
अत्यंत क्रोधायमान झालेले ऋषीवर अगस्त्यजीनी ताबड़तोब आचमण करत सपुंर्ण सागरच ऐका आचमणात प्राशन केला व आपल्या उदरात साठविला. तेंव्हा समुद्रातील जलचर प्राणी पाण्याविना तड़फड़ू लागले. सृष्टी चक्र कोलमडून गेले. सर्व देवी देवता ब्रम्हा विष्णू महेश तिथे येऊन ऋषी अगस्त्यजीची विनवणी करू लागले. ऋषीवर शांत झाले, पुन्हा एका आचमणात प्राशन केलेला समुद्र अगस्त्य ऋषिनी देवांच्या विनंतीवरून मुत्राद्वारे विसर्जित केला. तेंव्हापासून आजवर समुद्र क्षारयुक्त होऊन खारट झाला. आजचा सपुंर्ण सागरच्या हि अगस्त्यजीची सृष्टीला देण आहे. समुद्र आहे म्हणून त्या पाण्याचे बाष्पीभवन होते व पुन्हा मेघाद्वारे त्यांची जलवृष्टी होते. असे महान परोपरी तपस्वी अगस्त्य ऋषीचं वर्णन करताना भगवान श्रीरामचंद्र म्हणतात,
म्हणे उदारा रघुपति |
ऐसा पुरूषार्थी अगस्ती ||
या सुष्टीवर अनेक ऋषीमुनीचे उपकार आहेत
सध्या तर पितृपक्ष सुरु आहे. पितृपक्ष म्हणजे ऋषीमुनींच्या ऋणातून उतराई होण्याचा पर्वकाळ
प्रत्येक मनुष्याचे हे सप्त ऋषीपैकीच ऐक गोत्र असते. श्राद्ध करणे म्हणजे पितंराच्या व ऋषीमुनीच्या ऋणातून मुक्त होण्याचा पर्वकाळ
माहिती स्रोत
"पहावे पुराणी व्यासाचीया"
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
पौराणिक काळातील महान तपस्वी महर्षी वशिष्ठांचे बंधू विद्यं पर्वताचे गुरू अगस्त्यजी असल्याचा उल्लेख महाभारतात आला आहे. प्राचिन काळी मेरू पर्वत हा सर्व पर्वतांमध्ये उत्तुंग पर्वत म्हणून गणला जात असे. त्यांची उंच उंच शिखरे पाहून विद्य॔पर्वत स्वताची उंची मेरू पर्वतापेक्षा आधिक वाढवण्याची जणू स्पर्धाच लागली. यामुळे सुर्य गमनामध्ये बांधा येत कालगणनेतही अंतर पड़ू लागले. उंचीच्या अभिमानही विद्यंपर्वतास दिवसेंदिवस वाढतच होता. तेंव्हा सर्व देविदेवतांनी अगस्तजींना विनंती केली. महर्षी अगस्त्यजी दक्षिण दिशेस गमन करत असताना विद्यं पर्वत अगस्त्यजींना वंदन करण्यासाठी आड़वा झाला व महर्षीना मार्ग मोकळा करुन दिला. महर्षीनी पुन्हा परत येईपर्यंत "जैसा आहे तैसा"
रहाण्याची आज्ञा केली, परंतू महर्षी अगस्त्यजी पुन्हा त्या मार्गांनी न आल्याने आजही तो पर्वत आड़वाच आहे. ऋषिचे उपकार म्हणून दक्षिण देशासाठी आजही संपर्क होतोय.
भगवान शकंराच्या वरदान प्राप्तीने आतापी, वातापी व इल्वल हे तिन महाबलशाली दैत्य आपल्या आसुरी शक्तीच्या सामर्थ्यावर सर्वांचा कपटाने छळ करू लागले.
आतापी वातापी इल्वल |
तिघे दैत्य परम सबळ |
शिववरे महाखळ |
कापट्य सकळ जाणती ||
या महादैत्यांनी देवी देवता वगैरे कुणालाही आपल्या कपटातून सोड़ले नाही. हे आपल्या मायावी शक्तीने,
अन्नरूप होय एक |
दुजा निजांगे होय उदक |
एक अन्नदाता देख |
होऊनी बैसे वनातंरी ||
या तिघांपैकी एकाने अनछत्र माड़ायंच
एकान अन्न बनवायचे व एकाने पाणी बनायचे
असे हे महामायावी दैत्य होते. यांनी एकदा अगस्त्य ऋषीला आपल्या मायेने अन्न खायला दिले अन्न बनून एक भाऊ ऋषिच्या पोटात गेला पण म्हणतात,
हरिचीया भक्ता |नाही भय चिंता ||
अथवा
तुका म्हणे पोटी साठवीला देव |
ज्या भक्तांने देवच आपल्या पोटात साठवीला आहे त्याला राक्षस वा विषारी अन्नही काय करणार? नियोजित ठरल्याप्रमाणे मोठ्याभावाने अन्न बनून ऋषींच्या पोटात गेलेल्या भावाला हाक मारली. येरवी तो विषारी अन्नही बनून पोटात गेलेला पोट फोड़ून बाहेर यायचा. महर्षी अगस्त्यजींनी आपल्या पोटावरून योगसामर्थ्याने हात फिरवताच तो आतल्या आत पोटातच भस्म झाला.
उदरावरी फिरवून हस्तगत |
दैत्य भस्म केला पोटात ||
बरेचदा आपल्या भावाला आवाज दिला परंतू तो बाहेर येईना तेव्हा,
तव दोघे रूप धरिती थोर |
महाविक्राळ भयंकर |
धावले सत्वर |
ऋषीवरी ||
तेव्हा महर्षी अगस्त्यजींनी वातापीला एक बाण मारला तर त्याचे शिर आकाशात उड़ून गेले.
आपल्या दोन्हीही भावांचा मृत्यू झालेला बघून
दोघे निमाले देखोन |
इल्वल पळाला तेथुन |
तव तो घटोद्वव क्रोधायमान |
पाठी लागला तयाचे ||
अगस्त्यजी त्याच्या पाठिमागे धनुष्य बान घेऊन लागले सपुंर्ण भुमंड़ळात फिरला. परंतु,
पाठ न सोड़ी अगस्ती |
तव तो होऊनी कापट्यगती |
समुद्रजळी मिसळला ||
अत्यंत क्रोधायमान झालेले ऋषीवर अगस्त्यजीनी ताबड़तोब आचमण करत सपुंर्ण सागरच ऐका आचमणात प्राशन केला व आपल्या उदरात साठविला. तेंव्हा समुद्रातील जलचर प्राणी पाण्याविना तड़फड़ू लागले. सृष्टी चक्र कोलमडून गेले. सर्व देवी देवता ब्रम्हा विष्णू महेश तिथे येऊन ऋषी अगस्त्यजीची विनवणी करू लागले. ऋषीवर शांत झाले, पुन्हा एका आचमणात प्राशन केलेला समुद्र अगस्त्य ऋषिनी देवांच्या विनंतीवरून मुत्राद्वारे विसर्जित केला. तेंव्हापासून आजवर समुद्र क्षारयुक्त होऊन खारट झाला. आजचा सपुंर्ण सागरच्या हि अगस्त्यजीची सृष्टीला देण आहे. समुद्र आहे म्हणून त्या पाण्याचे बाष्पीभवन होते व पुन्हा मेघाद्वारे त्यांची जलवृष्टी होते. असे महान परोपरी तपस्वी अगस्त्य ऋषीचं वर्णन करताना भगवान श्रीरामचंद्र म्हणतात,
म्हणे उदारा रघुपति |
ऐसा पुरूषार्थी अगस्ती ||
या सुष्टीवर अनेक ऋषीमुनीचे उपकार आहेत
सध्या तर पितृपक्ष सुरु आहे. पितृपक्ष म्हणजे ऋषीमुनींच्या ऋणातून उतराई होण्याचा पर्वकाळ
प्रत्येक मनुष्याचे हे सप्त ऋषीपैकीच ऐक गोत्र असते. श्राद्ध करणे म्हणजे पितंराच्या व ऋषीमुनीच्या ऋणातून मुक्त होण्याचा पर्वकाळ
माहिती स्रोत
"पहावे पुराणी व्यासाचीया"
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
No comments:
Post a Comment