˙˙जय मुक्ताई ..

Wednesday, 28 September 2016

पुरे पुत्र माय एकची पोटी

   भारताच्या इतिहासात अनेक महान रत्नापैकी सदगुणाचा सागरच जणू असे देवरात
विद्यासपंन्न व वैभवसपंन्नही
याच प्रतिष्ठेला साजेल अशा सुशील व सुंदर सुनंदा नामक कन्येशी यांचा विवाह झाला
म्हणतात ना चांगल्या गोष्टीला कुणाची तरी दृष्ट लागतेच
अनेक वर्षे या दापंत्याला पुत्रसुख मिळाले नाही
सुनंदाच्या मातृह्रदयाला जणू पुत्र प्राप्तीची तहानच लागली होती
पुत्रप्राप्तीसाठी एक मोठा यज्ञ केला तेंव्हा आकाशवाणी झाली
*दैवी लोकोत्तर चैतन्य सुनंदाच्या उदरी जन्म घेईल*
फाल्गुन शुद्ध पचंमीला ऐक अलौकिक व चैतन्यमय बालकाचा सुनंदेच्या पोटी जन्म झाला
मुर्तीमंत तेज व साकार ब्रम्हंच जणू पृथ्वीवर अवतरले
मोजीबंधन करून या बालकाचे नाव ठेवले
*याज्ञवल्क्यं नारायणं नमस्कृतं*
बालपणीच वैदिक तपस्वी बालक सुनंदाच्या मांडीवर खेळू लागले
आनंदात सात वर्षे निघून गेली
वैदिक धारणे नुसार मुंज झालेले संतान आपले रहात नाही
त्याला गुरूगृही पाठवावे लागते
वैशंपायन ऋषीकड़े शिकायला पाठवले
तो ऋषीमुनींचा काळ म्हणजे आजच्या सारखा कागद पेन्सिलचा न्हवता
गुरूची जिव्हा हिच पेन्सिल

शिष्याचा मेंदू हाच कागद
गुरू जे जे बोलणार ते ते शिष्य आपल्या मेंदूतच नोंदवून घेत
ह्रदयाबरोबर ह्रदय बोलत होते
त्यात ज्ञान उत्क्रांत होत गेले
त्याकाळी गुरू ज्ञान सांगत जायचे

विद्यार्थी ग्रहण करत असे
*स्वयमेव मृगेंद्रता* अशेच ऋषीवर कुलपती होते
वैशंपायन ऋषीच्या आश्रमात सात वर्षात याज्ञवल्काने सारा यजुर्वेद पुरा केला
केवढी धारणा शक्ती व स्मरणशक्ती असेल
पुढे उद्यालक आरूणी ऋषीकड़े जाऊन पुढील अभ्यास सुरु केला
नतंर शाकल्यमुनीच्या आश्रमात ऋगवेद संहिता शिकण्यासाठी याज्ञवल्कजी गेले
थोडेच दिवसात ज्ञान संपादन करून प्रतिभाशाली बनले
कुठल्याही गोष्टीला राजाश्रय लागतोच
म्हणतात ना
*पंडिता वनीता लताः आश्रयाविन न शोभंती*
शाकल्यमुनीच्या आश्रमाला राजाश्रय होता तो विद्याव्यासंगी सुप्रिय राजाचा
आश्रमातील पवित्र तिर्थ रोज राज्याला पाठवले जायचे
एक दिवस कुणी शिष्य जवळ न्हवता म्हणून याज्ञवल्कजींना तिर्थ घेऊन राजदरबारी पाठवले
हे तिर्थ घेऊन गेले असता तिथे बघता तर
*कामातुराम् न भयंकर न लज्जा*
असे चित्र दृष्टीस पड़ले
गुरुजीची आज्ञा मोड़ली जावू नये याही अवस्थेत याज्ञवल्कजी सुप्रिय राजाला विचारतात
हे आश्रमातील तिर्थ कुठे ठेवू
राजा उद्धटपने म्हणाला
फेक त्या लाकड़ी खाबांवर
याज्ञवल्कजीनी ते तिर्थ खाबांवर फेकताच काय आश्चर्य?
त्या जड़ निष्प्राण खाबांवर चैतन्य निर्माण होऊन सारा खांब पल्लव व पुष्पांनी बहरून आला
आजच्या वैज्ञानिक युगात हे कदाचित नवल वाटेल
हा चमत्कार बघून राजा घाबरला
स्वतःची चुक कळली
तिर्थाचे महात्म्य कळाले
याज्ञवल्कजीची माफी मागीतली
परंतू याज्ञवल्कजी विनंतीने विरघळले नाहीत
राजा
लक्षात ठेव
या तिर्थाचे अपमानाचे फळ तुला भोगावेच लागेल
असे बोलून तिथुन शाकल्यमुनीच्या आश्रमात आले

गुरुजीना सांगितले
सुप्रिय राजा उन्मत आहे
आपल्या आश्रमाचे पवित्र तिर्थ असल्या उन्मत सत्ताधिशांकरीता नाही
असे मला वाटते
उन्मत व सत्ताधिशांपुढे मस्तक नमवायला याज्ञवल्क जन्माला आलेला नाही गुरूजी
असल्या लोकांचे मदतीवर आश्रय चालविण्यापेक्षा तो बंद केलेला बरा.
शाकल्यमुनी अत्यंत चिंतातुर झाले
शेवटी राजाश्रयाचा प्रश्न होता
याज्ञवल्कजी तिथून निघून पुढे पुन्हा वैशंपायन ऋषींच्या आश्रमात विद्या संपादनाकरीता आले
विद्याभ्यास सुरु झाला
एक दिवस अचानक वैशंपायन ऋषी पहाटे स्नानाला जात असताना उठायला उशीर झाला व घाईघाईत अंधारातच बहिणीच्या छोट्या बालकांचे अंगावर पाय पड़ला
बालक गतप्राण झाले
गुरुजीना ब्रम्हंहत्येचे पातक लागले
प्रायश्चित करावे तर लागणार
सर्वस्व सोडून तिर्थयात्रेला निघायचे
हजारोचे प्रेरणास्थान वैशंपायन ऋषी
आपल्या गुरूजींना झालेली शिक्षा याज्ञवल्काला आवडली नाही
ते अतिशय भावविवश झाले
त्या अवस्थेतच गुरूजीना म्हणाले
गुरुजी
तुमचे प्रायश्चित मी घेतो

तुम्हाला पापमुक्त करतो
याज्ञवल्कजीचे हे शब्द ऐकून आताचा एखादा लौकीक गुरू भाववश झाला असता
परंतू
याज्ञवल्काचे ते शब्द वैशंपायन ऋषीला लागले
त्यांचा अंहम जागा झाला
ते म्हणाले
याज्ञवल्का
तुला ज्ञानाची मस्ती चढली आहे
त्या धुंदीत तू वाटेल ते बोलत आहेस
याज्ञवल्कजीनाही गुरूजींचा आरोप सहन झाला नाही
ते म्हणाले
तुमच्याकड़े विद्या शिकलो म्हणून तुम्ही असे म्हणतात ना?
हवी तर तुमची विद्या तुम्हाला परत करतो
असे म्हणून त्यांनी सारा यजुर्वेद ओकत बाहेर टाकला

आश्रम सोडून निघून गेले
ओकलेली विद्या परत घेतली नाही तर नष्ट होईल म्हणून नाईलाजाने परत घ्यावीच लागली
ति ओकलेली विद्या म्हणून तैभिरीयशाखा म्हणून आजही ओळखली जाते
यालाच काळा यजुर्वेद असेही म्हणतात
आश्रमातुन निघत याज्ञवल्कजी वनात निघून गेले

*तत्सवितुर्वरेण्यं* कर्मयोगाचे आदर्श भगवान सुर्यनारायणाची उपासना करू लागले
त्यादिवसापासुन त्यांचे जगंल हेच विद्यापीठ व इश्वर हाच कुलपती बनला
भगवान सुर्यनारायण प्रसन्न झाले
सुर्यदेवाचे ज्ञान व सरस्वती मातेचे शब्द घेऊन स्वतंत्र वेद निर्माण केला
नव्या वेदाचा उद्गाता म्हणून सर्व ऋषीकूळ त्यानां वंदन करू लागले
तेंव्हा पासुन याज्ञवल्कजींना
योगेश्वर याज्ञवल्क म्हणतात
सुनंदा मातेच्या ड़ोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले
*कुलंपवित्रं जननी कृतार्था...*
तिचे मातृपद सफल झाले
तिच्या मातृवेदना सार्थकी लागल्या
संत महात्म्ये म्हणतात
भगवंता
असा ऐकच पुत्र पोटी यावा
त्यांने ऋषीऋण देव ऋण पितृऋण फेड़ावे
*पुरे पुत्र माय ऐकची पोटी!हरिस्मरणे उद्धरे कुळेकोटी!!*
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻
सकंलण सदंर्भ-
*पहावे पुराणी व्यासाचीया*
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

2 comments: