सर्व पुर्ण करी मनोरथ
ईश्वर प्राप्ती या जन्मीच व्हावी हि तर प्रत्येकाचीच इच्छा असतेच परंतू, त्यासाठी परिपूर्ण अशा ज्ञानाची गरज असते. भगवान गीतेत अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात,
"श्रद्धावानं लभ्यते ज्ञान"
श्रद्धेमध्ये अदभुत असे सामर्थ्य असते, फक्त त्यासाठी त्या साधकाने स्वतःला पुर्णपणे त्यासाठी वाहून घेतले पाहीजे. अगदी अंतकरणाच्या तळमळीने व आत्मीयतेने त्याने हे कार्य केले पाहीजे. आपल्यापैकी अनेकांची इच्छा तर असते मात्र एखादे कार्य करण्याची इच्छाशक्ती मनात नसते, ईश्वर तर भेटावा हि इच्छा असते पण त्यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट सोसायला लागू नये अथवा काहीही त्याग करण्याची वेळ येऊ नये
ईश्वराप्रती व ईश्वरीकार्याप्रती श्रद्धा दृढ असावी लागते. श्रद्धेमुळे असंभाव्य देखिल संभ्याव्य होते
श्रद्धेमुळे रेताड़ वाळवंटातुनदेखील नौका सरसर मार्ग कापित पुढे जाते. आचार्य विनोबा भावे यांनी वर्ध्याच्या तुरुंगात असताना दिलेली गीतेवरील प्रवचने तेव्हा तिथेच शिक्षा भोगत असलेल्या साने गुरुजींनी शब्दश: लिहून घेतली. महर्षी व्यासकृत महाभारताचे सार अशी गीता भारतीयांना कायमच दिशा दाखवत आलेली आहे. तिचा संदेश विनोबाजी सोप्या, सामान्यांना समजेल अशा भाषेत पोहोचवितात. हेच आचार्य विनोबाभावेंची सानेगुरुजीलिखीत गीताप्रवचने सोशील मिड़ीयाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा शुभ सकंल्प मागील वर्षी गांधीजयंती दिनी "ह भ प दत्तात्रय शिंदे(अण्णा)" यांच्याकरवी केला गेला. सकंल्प आण्णांनी केला व तो पुर्ण करण्याचा भार भगवान श्रीकृष्ण व विनोबांजीवर टाकत आज पुर्णत्वाला गेला. कुठलिही बाब नित्यनेमाने करणे हे अगदी संसारी मनुष्याला तरी अशक्य असते. परंतु, शिंदे अण्णांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्माने सकंल्प पुर्णत्वाला नेला. आम्ही माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात अनुभवले आहे. किती प्रतिकूल परस्थितीतही आपला गीता प्रवचन पोस्टचा नेम टळला नाही. म्हणतात ना सकंल्प तेव्हा पुर्णत्वाला जातो, तो सत्य सकंल्प असावा लागतो. तेंव्हा कुठे,
"सत्य सकंल्पाचा दाता नारायण |
सर्व पुर्ण करी मनोरथ ||"
गेल्या वर्षभरात आचार्य विनोबाभावे गीता प्रवचने सोशील मिड़ीयाच्या माध्यमातून वाचक वाढत गेले व लाखोच्या संख्येत जनसामान्यापर्यंत पोहचली. या अत्यंत दुर्मिळ व अविट अशा संत साहित्याचा एक सुदंर असा ब्लॉग असावा हि अपेक्षा शिंदे अण्णा उद्या महात्मा गांधीजी जयंती दिनी आपल्याकड़ून नाविन्यपूर्ण नविन क्रमशः लेखणीची आस ठेवत शब्द प्रपंचाला विराम देतो..
जय हो
जय मुक्ताई🚩
ऋणनिर्देश
चैतन्याचा जिव्हाळा परिवार
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
ईश्वर प्राप्ती या जन्मीच व्हावी हि तर प्रत्येकाचीच इच्छा असतेच परंतू, त्यासाठी परिपूर्ण अशा ज्ञानाची गरज असते. भगवान गीतेत अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात,
"श्रद्धावानं लभ्यते ज्ञान"
श्रद्धेमध्ये अदभुत असे सामर्थ्य असते, फक्त त्यासाठी त्या साधकाने स्वतःला पुर्णपणे त्यासाठी वाहून घेतले पाहीजे. अगदी अंतकरणाच्या तळमळीने व आत्मीयतेने त्याने हे कार्य केले पाहीजे. आपल्यापैकी अनेकांची इच्छा तर असते मात्र एखादे कार्य करण्याची इच्छाशक्ती मनात नसते, ईश्वर तर भेटावा हि इच्छा असते पण त्यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट सोसायला लागू नये अथवा काहीही त्याग करण्याची वेळ येऊ नये
ईश्वराप्रती व ईश्वरीकार्याप्रती श्रद्धा दृढ असावी लागते. श्रद्धेमुळे असंभाव्य देखिल संभ्याव्य होते
श्रद्धेमुळे रेताड़ वाळवंटातुनदेखील नौका सरसर मार्ग कापित पुढे जाते. आचार्य विनोबा भावे यांनी वर्ध्याच्या तुरुंगात असताना दिलेली गीतेवरील प्रवचने तेव्हा तिथेच शिक्षा भोगत असलेल्या साने गुरुजींनी शब्दश: लिहून घेतली. महर्षी व्यासकृत महाभारताचे सार अशी गीता भारतीयांना कायमच दिशा दाखवत आलेली आहे. तिचा संदेश विनोबाजी सोप्या, सामान्यांना समजेल अशा भाषेत पोहोचवितात. हेच आचार्य विनोबाभावेंची सानेगुरुजीलिखीत गीताप्रवचने सोशील मिड़ीयाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा शुभ सकंल्प मागील वर्षी गांधीजयंती दिनी "ह भ प दत्तात्रय शिंदे(अण्णा)" यांच्याकरवी केला गेला. सकंल्प आण्णांनी केला व तो पुर्ण करण्याचा भार भगवान श्रीकृष्ण व विनोबांजीवर टाकत आज पुर्णत्वाला गेला. कुठलिही बाब नित्यनेमाने करणे हे अगदी संसारी मनुष्याला तरी अशक्य असते. परंतु, शिंदे अण्णांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्माने सकंल्प पुर्णत्वाला नेला. आम्ही माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात अनुभवले आहे. किती प्रतिकूल परस्थितीतही आपला गीता प्रवचन पोस्टचा नेम टळला नाही. म्हणतात ना सकंल्प तेव्हा पुर्णत्वाला जातो, तो सत्य सकंल्प असावा लागतो. तेंव्हा कुठे,
"सत्य सकंल्पाचा दाता नारायण |
सर्व पुर्ण करी मनोरथ ||"
गेल्या वर्षभरात आचार्य विनोबाभावे गीता प्रवचने सोशील मिड़ीयाच्या माध्यमातून वाचक वाढत गेले व लाखोच्या संख्येत जनसामान्यापर्यंत पोहचली. या अत्यंत दुर्मिळ व अविट अशा संत साहित्याचा एक सुदंर असा ब्लॉग असावा हि अपेक्षा शिंदे अण्णा उद्या महात्मा गांधीजी जयंती दिनी आपल्याकड़ून नाविन्यपूर्ण नविन क्रमशः लेखणीची आस ठेवत शब्द प्रपंचाला विराम देतो..
जय हो
जय मुक्ताई🚩
ऋणनिर्देश
चैतन्याचा जिव्हाळा परिवार
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/