˙˙जय मुक्ताई ..

Friday, 3 November 2017

जंतूनाम्_नरजन्म_दुर्लभमिदम्

जंतूनाम्_नरजन्म_दुर्लभमिदम्
श्रीविठ्ठल
जगतातील भगवंताची सर्वोत्कृष्ट निर्मिती जर काय असेल तर ती मानव.
आपल्याला मिळालेल अतीशय पवित्र अस मानवी जीवन हे अनेक जन्माच्या सुकृताचे फळ आहे.
अत्यंत दुर्लभ असा मानवजन्म मिळला हा कागताली न्याय आहे.
इतर प्राणी व मानव यात आहार, निद्रा, भय व मैथून आदी गुण समान आहेत
परंतू
पशू काय पाप पुण्य जाणती
यातुलनेत भगवंताने बुद्धी हा एक विशेष गुण मानवात दिला आहे.
मन, बुद्धी, चित्त व अंहकार असलेल अंतकरण मानवाला दिलय.
मानवाला मिळालेली ही नररूपी रत्नाची खाण आहे.
अस अत्यंत दुर्लभ असा देह ज्यात
कृतज्ञता, अस्मिता, भावमयता व कृतीप्रणवता
हे चार विशेष गूण आहेत
असा देवाने दिलेला देहाचा कसा वापर करायचा.
संत महात्मे म्हणतात *मनुष्यपन तरी साधी नारायण*
असा देवाची प्राप्ती करून देनारा मानवी देह देवादिकांना कळाला पन मिळाला नाही.
पशु पक्षांना मानवदेह मिळालाही नाही व कळालाही नाही.
साधु संताना मिळालाही व कळालाही
म्हणून तर ते म्हणतात
मनुष्य देहा ऐसे निध !

साधाल ते साधा सिद्ध !
करूनी प्रबोध !
संत पार उतरले !!

साधुसंत गेले आनंदी राहीले !

 हरिनामे झाले कृतकृत्य !!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

म्हणोनि_कुळ_जाति_वर्ण

म्हणोनि_कुळ_जाति_वर्ण
    महाराष्ट्राच्या_मातीवर_समतेचे आणि ममतेचे जे संस्कार झाले ते वारकरी संप्रदायामुळे आणि पांडुरंग परमात्मा या महनीय दैवतामुळे.म्हणूनच आपण पहातो की,सामान्य माणूस खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन ज्ञानोबा-तुकाराम,विठोबा-रखुमाई आणि या विठ्ठलाचे अभंग गात गात शेकडो मैल जमीन पायी चालत आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येतो.आणि मनोमन सुखावून जातो. #आषाढी कार्तिकी विसरू नका मज।सांगतसे गुज पांडुरंग। असं स्वतः परमात्मा सांगतोय अस संतवचन आहे.असंख्य भक्तांच्या मानसिक सुखाचं हे माहेरघर आहे.वारकरी संप्रदाय हा समता विचारानं भरलेला आहे.संताच्या वाङमयात सुद्धा समतेच्या विचाराला प्राधान्य दिसून येते.एका अर्थान आपण असही म्हणू शकतो की वारकरी संप्रदाय हा समतेची मशाल हाती घेऊन अवघ्या विश्वाच्या अंधारलेल्या मनात प्रकाश पाडीत प्रवास करीत आहे.आणि याचा प्रत्यय हा आषाढी-कार्तिकीच्या वेळी भारतातल्या आणि भारताबाहेरूनही येणारी जी लोकगंगा चंद्रभागेला येऊन मिळते तेव्हा येतो.वारकरी पंथाच्या या महाद्वारातून कोणत्याही जातीचा आणि वर्णाचा भक्त पांडुरंगाची भेट घेऊ शकतो.वारकरी पथांची विचारसरणी विश्वाला महान शिकवण देणारी आहे. हिथे जातीपातीचा नाही तर भक्तीचा विचार होतो.माऊलींची सुंदर ओवी आहे,
म्हणोनि_कुळ_जाति_वर्ण।

हे आघवेचि या अकारण।
एथ अर्जुना माझेपण।
सार्थक एक।
#जयमुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

सत्य_तु_सत्य_तु_सत्य_तु

सत्य_तु_सत्य_तु_सत्य_तु
श्रीविठ्ठल
एका
सत्याचाच सार्‍या विश्वाला आधार असतो.
नित्य एकरस, अविकारी व अधीनाशी असणे हेच सत्याचे लक्षण आहे.
कर्तव्यरूप स्वधर्म पालनाने सत्याची प्राप्ती होऊ शकते.
शम, दम,समता,क्षमा, तितीक्षा ,मत्सराचा अभाव, असूया , त्याग, ईश्वर निष्ट धैर्य व अंहिसा यागुणांच्या योगाने सत्य प्रगट होते.
अशा सत्याचा उदय ज्याच्या अंतकरणात झाला आहे त्यांना प्रचिती आलेली असते
*सत्य तु सत्य तु सत्य तु विठ्ठला*
त्यांच्याकरवी या ईश्वरी जगताच्या अकल्याणाचे कार्य कधीच घङू शकत नाही.
कारण
या परम सत्याला शांतीचे अधिष्ठान असते

अशा
सत्याची प्रभा मगंल असते.
त्यायोगेच त्यांच्या व इतरांच्याही आयुष्याची संध्याकाळही मगंलच होत असते.
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

सुख के माथे सिल परो

🌺|| श्री विठ्ठल ||🌺
सुख के माथे सिल परो,
नाम हृदय से जाये ,
बलिहारी उस दुःख की,
कि पल पल नाम रटाये ।

ऐसे सुख साधन को गोली मारो, जो भागवत नाम का विस्मरण करा दे, पत्थर से सर फोड़ दो ऐसे सुख का. इससे तो दुःख भला जो भगवान का नाम तो मुख से निकलवा देता है।
#जय_जय_मुक्ताईं
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

तुळशी विवाह

तुळशी विवाह
तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत, या सणाची वैशिष्ट्ये, तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, तसेच ‘देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर का करावा ?’, यासंबंधीची माहिती येथे देत आहोत.

१. तिथी
हा विधी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात.

२. पूजन
श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात.

३. वैशिष्ट्ये
तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रतेघेतलेली असतील, त्या सर्वांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील, ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः सेवन करतात.
तुळशी विवाहाच्या दिवशी सायंकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या सूक्ष्मतर लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते. वातावरणातील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो. या लहरींच्या संयोग सोहळ्यालाच तुळशी-विवाह असे म्हणतात. तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाच्या रूपात श्रीविष्णूची पूजा केली जाते. या दोन्ही तत्त्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सायंकाळी तुळशी-विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाहाच्या मुहूर्त कालातच श्रीविष्णु-लक्ष्मी या दोन तत्त्वांच्या लहरींचे आगमन आणि संयोग घडून येत असतो. वातावरणातील या सात्त्विकतेचा फायदा मिळावा, यासाठी तुळशी-विवाह हा मुहूर्त कालातच करावा.

४. तुलसी दर्शनाचे महत्त्व
‘प्रत्येक हिंदूच्या घरी तुळस असायलाच हवी’, असा संकेत आहे. ‘सकाळी आणि सायंकाळी सर्वांनीच तुलसीदर्शन करावे’, असे सांगितले आहे. या तुलसीदर्शनाचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे.
तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥ – तुलसीस्तोत्र, श्‍लोक १५
अर्थ : हे तुलसी, तू लक्ष्मीची मैत्रीण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारदाने स्तवलेल्या आणि नारायणाला प्रिय अशा तुला मी वंदन करतो.

५. तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये
५ अ. पापनाशक : ‘तुलशीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, नमन, पूजन, रोपण आणि सेवन या गोष्टी युगायुगांची पातके नष्ट करतात.
५ आ. पवित्रता : तुलसीचे बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र बनते. या संदर्भात स्कन्दपुराणात (वैष्णवखण्ड, अध्याय ८, श्‍लोक १३ मध्ये) म्हटले आहे,
तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते ।
तद् गृहं तीर्थभूतं हि नायान्ति यमकिङ्कराः ॥
अर्थ : ज्या घरी तुलसीचे वन आहे, ते घर तीर्थासारखे पवित्र होय. त्या घरात यमदूत येत नाहीत.
५ इ. सर्व देवतांचा वास असणे : ‘तुलशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात’, असे सांगितले आहे.
५ ई. श्रीविष्णूला परमप्रिय असणे
१. तुलसी वृंदावनात रहाते. ती श्रीविष्णूला परमप्रिय आहे.
२. तुलसीदलाविना श्रीविष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते. पद्मपुराणात म्हटले आहे की, सुवर्ण, रत्ने आणि मोती यांची फुले श्रीविष्णूला वाहिली, तरी त्यांना तुलसीदलाच्या १६ व्या कलेचीही सर येणार नाही.
३. तुलसीपत्र ठेवल्यावाचून किंवा तुलसीदलाने प्रोक्षण केल्यावाचून श्रीविष्णु नैवेद्य ग्रहण करत नाहीत.
४. कार्तिक मासात (महिन्यात) तुलसीदलाने केलेल्या विष्णुपूजेचे माहात्म्य विशेष आहे.
५. श्रीविष्णु, श्रीकृष्ण किंवा पांडुरंग यांच्या गळ्यात तुळशीचा घवघवीत हार घालतात.
संदर्भ : ‘भारतीय संस्कृतीकोश’, खंड ४, पान क्र. १५५

६. तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा !
देवांचे जलंधर दैत्याशी युद्ध चालू होते. त्या जलंधराची वृंदा नावाची पत्नी पतीव्रता होती. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे देवांकडून जलंधर दैत्याचा वध होत नव्हता. श्रीविष्णूने जलंधराचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. त्याच वेळी श्रीविष्णूने वृंदेच्या पातिव्रत्यावर प्रसन्न होऊन तिला वर दिला, ‘वृंदा, तू तुळस होऊन सर्वांना वंदनीय होशील. तुझ्या तुलसीपत्राने भक्त माझी पूजा करतील. तसेच प्रतिवर्षी कार्तिक मासात तुझा विवाह माझ्याशी लावण्यात येईल.’ भगवान श्रीकृष्ण हा श्रीविष्णूचा पूर्णावतार आहे. त्यामुळे प्रतिवर्षी कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावतात.

७. देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानाचा वापर का करावा ?
देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोचणे, सात्त्विक होणे आणि त्याच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता न्यून होणे
७ अ. तुळशीचे वैशिष्ट्य : तुळस ही वनस्पती वायूमंडलातील सात्त्विकता खेचण्यात आणि ती प्रभावीपणे जिवाकडे प्रक्षेपित करण्यात अग्रेसर आहे. ब्रह्मांडातील श्रीकृष्णतत्त्व खेचून घेण्याची क्षमताही तुळशीत अधिक असते.
७ आ. लाभ
१. तुळशीच्या पानाने नैवेद्य दाखवल्याने सात्त्विक अन्नातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म-लहरी तुळशीच्या पानाकडून ग्रहण केल्या जातात. असे सूक्ष्म-लहरींनी युक्त पान नंतर देवाला अर्पण केल्यामुळे देवतेच्या तत्त्वाकडून त्या लहरी पटकन ग्रहण केल्या जातात. अशा प्रकारे आपण अर्पण केलेले अन्न तुळशीच्या पानांच्या माध्यमातून देवतेपर्यंत लवकर पोचून देवता लवकर संतुष्ट होण्यास साहाय्य होते.
२. अन्नावर आलेले रज-तम कणांचे आवरण तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे न्यून (कमी) होते. तुळशीदलातून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे नैवेद्याभोवतीचे वायूमंडल शुद्ध झाल्याने नैवेद्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यताही न्यून होते.
३. नैवेद्यावर भावपूर्णरित्या तुळशीदल ठेवल्याने ते त्याच्या उपजत गुणधर्माप्रमाणे देवतेकडून येणारे चैतन्य ग्रहण करून प्रभावीपणे नैवेद्याकडे संक्रमित करते. नंतर अशा नैवेद्याच्या सेवनाने जिवाच्या देहाला चैतन्यलहरी मिळण्यास साहाय्य होते.’
व्हॅटसप सौजन्याने
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

तव_तु_हरिगुण_गाय

#तव_तु_हरिगुण_गाय
श्रीविठ्ठल
मरन केव्हा येईल हे कुनालाच सागंता येणार नाही.
मृत्यूचे प्रभुत्व सर्व जगतावर आहे.
मासे पकङनारे लोक माशांना सुचना थोङेच देतात अगोदर
त्यांना वाटेल तेव्हा ते आपले जाळे टाकतात.
तसे काळाच्या कधी मनात येईल सांगता नाही येत.
जेव्हा काळाच्या मनात येईल तेव्हा आपली वेळ भरली असे समजावे.
घङी घङी काळ वाटच पहात असतो.
जिवाला पुर्वसुचना देण्याचे बधंन काळावर थोङेच आहे.
यासाठी तारूण्यात असताना धर्माचरणासाठी वृद्धपनिची वाट पहान शहानपणाच कस ठरेल?
याकरीता संतमहात्मे म्हणतात
जव काळ असे दुरी ठेला !

तव तु हरिगुण गाय ऐक वहीला !!
जयमुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Tuesday, 10 October 2017

विश्वात्मक मैत्री

शके बाराशे बारोत्तरे |
टिका केली ज्ञानेश्वरे ||
     माऊली ज्ञानोबारायांच्या अगोदर हजारो ग्रंथकर्ते होऊन गेले परंतु,
व्यासाचा मागोवा घेत |
भाष्यकाराते वाट पुसतू ||
किंवा
वेदमार्गे मुनी गेले तेची मार्गे चालिलो |
    म्हणणाऱ्या माऊली ज्ञानोबारायांनी ज्या दिवशी पसायदान लिहिले तो खरा जागतिक मैत्री दिवस..
      साऱ्या विश्वासाठी विश्वबंधुत्वाच  पसायदान मागणाऱ्या ह्या विश्वालाच मैत्री साठी साक्षात साकङ घातल, ऐका आकाश गंगेत एक अब्ज सुर्यमाला आहेत, त्यातली आपली एक सुर्यमाला, त्यात पृथ्वी पुन्हा त्यात भारत, पुन्हा आपल राज्य, जिल्हा, तालुका, गाव, आपल घर व आपन किती व्यापकता आहे विचाराची, त्या जगतात सूर्यदेवाचे पन एक नाव मित्र आहे, पृथ्विचा गुण आहे क्षमा आणि सुर्य तर तळपत असतो, तरीही अशा अनोख्या पृथ्वी-सूर्यातलं हे मैत्रीचं नात ही माऊली ज्ञानोबारायांची संकल्पना आहे. विश्वाला सुखी करण्याची. भगवंताकङे केलेली मागणी पुर्ण झालेवर माऊली म्हणतात,
ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा |
पादपद्मी ठेवा निरतंर ||
 आणी हाच आदर्श ठेवणारे आपनही त्याच ज्ञानोबा तुकोबाचे ज्ञान वशं आहोत ना? मग आपल्यातली मैत्रीही अशीच आकाशाला गवसणी घालणारी व्यापक होईल ना?
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Sunday, 8 October 2017

🌺।। श्री विठ्ठल ।।🌺

विवेकी तये ठायीं न गुंतेची

     या जगात प्रत्येक गोष्ट ही नाशिवंत आहे. म्हणून आपण या नाशिवंत जगात मनाने गुंतून पडू नये . श्री संत चोखोबाराय म्हणतात,
फुलाचे अंगी सुवास असे ।
फूल वाळलिया सुवास नासे ॥
मृतिकेचे घट केले नानापरी ।
नाव ठेविलें रांजण माथण घागरी ॥
विराली मृत्तिका फुटलें घट ।
प्राणी कां फुकट शोक करी ॥
चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाहीं ।
विवेकी तये ठायीं न गुंतेची ॥
   फुलाच्या अंगी भलेही सुवास असो, फूल वाळल्यावर तो सुवास नासतो. त्याचप्रमाणे जगातील प्रयेक गोष्टीत कितीही सौदर्य साठलेले असू दे, ते कधी ना कधी तरी नष्ट होत असते .
     ज्याप्रमाणे मातीच्या विविध प्रकारच्या वस्तू केल्या जातात. त्यांना रांजण, घागरी, माथण घागरी अशी विविध नावे दिली जातात. पण सर्व वस्तू शेवटी मातीच्याच असतात . कधी ना कधीतरी ते फुटू शकतात.
    माणसांचे पन तसेच असते. माणसे ही विविध प्रकारची असतात. त्यांना वेगवेगळी नावे असतात. पण सारी माणसे नाशिवंतच असतात. कधी ना कधी तरी त्यांचा शेवट होणारच असतो. कोणताही माणूस भले कितीही श्रीमंत असो, विद्वान असो, उच्च अधिकारी असो, त्याचा शेवट हा होणारच आहे .
  आपल्याला कोणाच्याही मृत्युचे मोठे दुःख होते. पण मरण फार दुःख करण्यासारखी गोष्ट नाही. एखादी मातीची वस्तू फुटण्याचे कोणी दुःख करत बसत नाही. मग माणसाच्या मरणाचे तरी दुःख का करत बसावे?
      मानवी जीवनात सुख हे मृगजळासारखे असते. मृगजळाच्या पाठीमागे कितीही धावले तरी ते हाती लागत नाही. मानवी जीवनातील सुखांचाही कितीही पाठलाग केला तरी ती सुखे कायमची हाती लागणार नाहीत. हाती लागलेली सुखे किती काळ टिकून राहतील, याचा भरवसा नसतो.
    अशा या जीवनात माणसाने मनाने फार गुंतू नये, असे चोखाबारायांना वाटते. अमुक एक व्यक्ती किंवा अमुक एक गोष्ट मला कायमचे सुख देईल, असे गृहित धरू नये. या जगात शाश्वत सुख देणारा फक्त परमात्माच असतो. म्हणून फक्त परमात्म्याकडूनच शाश्वत आनंद मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे . जे जगच मुळात अशाश्वत आहे , त्याच्याकडून शाश्वत आनंदाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. म्हणून तशा प्रकारची अपेक्षा करू नये,  जो फक्त परमात्म्याकडूनच शाश्वत आनंदाची अपेक्षा करेल, असा माणूस हा आपणच आहोत व तसे विवेकी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

संग्रहीत_चिंतन
जय जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

आता जागा रे भाईनों जागा


आत्मज्ञाने चोखङी ! संत माझीच गा रूपङी !
   सर्व संत हे त्रिकालदर्शी असतात. ते पुर्ण बोधावर असतात. ते अमुर्तालाच मुर्तिरूपात समदृष्टीने पहातात. पापपुण्याची व्याखा तर कुठेही समानच आढळते. कुणी त्याला दोजख म्हणतात तर कुणी त्याला हेल म्हणतात. इथ ऐक गोष्ट समान आहे ति म्हणजे काळतत्व. तो काळ इतका बलवत्तर आहे
कि त्याच्यापुढे कुणीच टिकला नाही.
आजवर
येथे नाही उरो आले अवतार !
येर ते पामर जिव किती !!
  प्रत्येक अनुयायींमध्ये याच काळाची शिकवन देऊन सावध केले जाते, कुणी याला खौफ किंवा ङर म्हणतील, कुणी याला आकाशाचा बापही म्हणतील,
पण सार शेवटी ऐकच
आयुष्य खातो काळ सावधान !!
   जिवनात ऐकच गोष्ट महत्वाची दिसली चमत्कार करणार्‍या पेक्षा काळाच अंतीम सत्य सांगणाऱ्या संताची कास धरूया, म्हणजे आत्म बोधाचाही विसर पङनार नाही, कारण त्यांच्या मार्गावर चालताना काहीच कराव लागत नाही.
जगा काळ खाय !
आम्ही माथा दिला पाय !!
अशा संत महात्म्यांचे आपन अनूयायीच ना? मग चला, ज्यांनी स्वतः काळावरच विजय मिळावला आहे त्याच मार्गाने
पुढे गेले त्याचा शोधित मारग !
चला जाऊ माग घेत आम्ही !!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

लागो आगी नावा

लागो आगी नावा

   शरीराचा जन्म होतो म्हणून त्याला मरावच लागत.
कारण हा सृष्टीचा नियमच आहे.
उपजे ते नाशे !
नाशीले ते पुनरपी दिसे !
हे घटिका यंत्र जैसे !
परीभ्रमे गा !!
  जो जन्माला आला तो मरनारच.
जो खाटावर आला तो कधीतरी ताटीवर जाणारच.....
आजा मेला पनजा मेला बाप म्हसना गेला !
देखत देखत नातू पनतू तोही तैसा झाला !!
येथ नाही उरो आले अवतार !
येर ते पामर जिव कीती !!
   मग रङत बसण्या पेक्षा आनंदाने सृष्टीच्या परीवर्तनाची वाट पहावी. आत्मा बदलत नाही, मग चिंता कशाला? उगाच शरीराची उत्पती समजून स्वभाव जानून घेतला पाहिजे.
शरीर जर नाशिवंत स्वभावे मग त्याचे किती लाङ पुरवायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे
नौ भी मर गये दस भी मर गये मर गये जिन्दा जोगी
सगळेच मरनारच आहे,
उदंङची झाले जन्मोनीया मेले !
होउनीया गेले रावरंक !!
त्याचे नाम कोणी नेघे चराचरी
मग आपल्या नावाचाही अट्टाहास कशासाठी.....
तुकाराम महाराज म्हणतात,
क्षण एक तोही नाही विसावा !
लक्ष चौर्याशी घेतल्या धावा !
भोवङंती पाठी लागल्या हावा !
लागो आगी नावा माझ्या मिपना !!
अशा नाशिवंत शरिराकङुनच आनंदाची अपेक्षा करनच मुळात हास्यास्पद आहे. या नाशिवंताचा कशाला अभिमान पाहिजे उगाचच
यापेक्षा तुकोबाराय म्हणतात,
निरंजनी आम्ही बाधियंले घर !
निराकारी निरंतर राहीलोसे !!
  उपदेशापेक्षा आपन स्वताच उपदेशीत होन कधीही चांगले. निराकार भक्ती सोपी नाही पण अवघङही तितकी नाही. साधुसंत तिथेच तर वास्तव करतात म्हणून साधक जिवनात हेच तर अंतिम ध्येय असते.
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Monday, 2 October 2017

साबरमती के संत तूने कर दिया कमाल...

साबरमती के संत तूने कर दिया कमाल...

     हे गीत कानावर पडले की  हातात काठी,डोळ्यांवर चष्मा,धोतर घातलेली,त्याच्यावर लटकणारे घड्याळ डोक्यावर एकही केस नसणारी व्यक्ती नजरेसमोर येते ती म्हणजे अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची कामगिरी पार पाडलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी उर्फ बापूजी.भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा थोर नेत्यांमधे महात्मा गांधीजी यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.ब्रिटिश सरकारविरोधात प्रत्येक भारतीयाने आपआपल्या  पद्धतीने मार्ग स्वीकारला असेल पण या साबरमतीच्या संताने ना शस्त्र हाती घेतले ना शब्द अस्त्र हाती घेतले. निव्वळ सत्याग्रहाच्या बळावर इंग्रजांना वठणीवर आणले.त्यासाठीच त्यांनी समाजात जनजागृतीनिर्माण केली त्यात देशाभिमान आणि त्याग यांना अनन्यसाधारण महत्व होते.याकामी स्वतःचे जीवन तसे घडविले.भगवद्गीतेतला निष्काम कर्मयोग त्यांनी स्वीकारला.भगवद्गीता ही त्यांची सांयसंध्या प्रार्थना होती. २ अॉक्टोबर १८६९ मध्ये पोरबंदर येथे  त्यांचा जन्म झाला.त्यांच्या लहाणपणीच्या कथातर मोठया विलक्षण आहेत.
सत्य
   गांधीजीचे सत्यावर लहानपणापासून प्रेम होते.वाईट संगतीत जाण्यामुळे लहानपणी विडी पिण्याची गोष्ट स्वतः त्यांनी लिहिली आहे.त्यासाठी चोरी करावी लागली असही त्यांनी नमूद केल आहे.शेवटी वडिलांसमोर बोलण्याची हिमंत नव्हती म्हणून चिठ्ठीतून झालेली चूक सांगितली वडिलांनी आपल्या या सत्यवादी मुलाला माफ करून हृदयाशी धरले. या मागचे कारण म्हणजे आई पुतळाबाई यांचे संस्कार लहानपणापासूनच त्यांना भक्त प्रल्हाद आणि राजा हरिश्चंद्र या दोन सत्याग्रहींचा कथा खूप प्रिय होत्या.कारण ज्याला स्वतःला सत्य प्रिय आहे त्याला सत्यवादींच्या कथा प्रिय असणारच.याचाच आदर्श ब्रिटीश सरकारशी सत्याग्रह म्हणून पुढे आला. वैष्णव आणि गांधीजी अनेकांना आश्चर्य वाटेल पण गांधीजी म्हणायचे माझ्या,मनाने मी वैष्णवच आहे.संत नरसैय्या वैष्णवांचे लक्षण दाखवून गेला,आहे त्या वैष्णवाला मी ओळखतो आणि तसा वैष्णव होण्याचा प्रयत्न करीत आहे.
वैष्णव जन तो तेने कहीऐ जे पीड पराई जाणे रे
  त्यांच आवडत भजन त्याच बरोबर
रघुपति राघव राजराम पतित पावन सिताराम
हे तर सर्वांच्या मुखात असते.स्वःतची बहुतांशी कर्मे बापूजी स्वतःच करत इतराकडून सेवा करून घेणे त्यांना पसंत नव्हते.वारकऱ्यांच्या सहित इतरही लोकांच्या मस्तकावर दिसणारी सफेद टोपी ही बापूजींची देणगी आहे.तिलाच आपण गांधी टोपी असं म्हणतो.गांधीजींचा इतिहास हा आजच्या समाजासमोर जसा मांडला जातो तो कितीतरी चुकीचा आहे.सत्याग्रही गांधीजींच्या विचारात केवळ माणुसकी दिलेला शब्द पाळणे,आहिंसेचा लढा यांना महत्व होते.त्यांचे हे विचार काहींना पटत नव्हते देशाच्या फाळणीला गांधीजीचे हे विचारच कारणीभूत आहेत असा वहीम आसलेल्यांनीच वैचारीक संघर्षातून ३० जानेवरी १९४८ ला हत्या केली.महात्मा गांधीजींचे कट्टर,अनुयायी असणारे आचार्य विनोबा भावे यांनी त्यांच्या उपदेशाचे आणि सत्याग्रही व्रताचे असे सूत्र तयार केले आहे.
अहिंसा-सत्य,अस्तेय,ब्रम्हचर्य,असंग्रह,शरीरश्रम,स्वदेशी,भयवर्धन,सर्वधर्मी,समानत्व  या सुत्राचा जर बारकाईने विचार केला तर महात्मा गांधीजी यांनी जीवन कसे व्यतीत केले ते समजून येईल.असो आज बापूजींची जयंती त्यानिमित्ताने आपल्या "चैतन्याचा जिव्हाळा" या पेजने या थोर आणि महान नेत्याविषयी केलेला हा छोटासा शब्दप्रपंच.
सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने सर्वसामान्यांना स्वातंत्र्य लढ्याशी जोडणाऱ्या थोर महात्म्यास  आपल्या पेजकडून विनम्र अभिवादन!💐💐💐
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

आंम्हा नारायण तैशापरी

🌺|| श्री विठ्ठल ||🌺

आंम्हा नारायण तैशापरी......

   एका राजाच्या दरबारात एक अतिशय विद्वान शास्त्रीबुवा होते. ते जेव्हा दरबारात यायचे तेव्हा राजा एकसारखा टक लावून पहात असे. शुभ्र रेशमी धोतर, तसाच लांब अंगरखा, जरी काठी उपरणे, हातात चांदीची काठी, गळ्यात स्पटीकाची माळ, कानात कुड़ंले व मस्तकावर विविध रंगाची रेशमी सुताची पगडी, असा त्यांचा थाट.

    यात विशेषता म्हणजे राजा शास्त्रीबुवाच्या या पगड़ीवरच भाळला होता. एक दिवस राजाने समय साधुन शास्त्रीबुवांना विचारलेच
"शास्त्रीजी आपन जी पगड़ी परिधान करता ती आपन कुठल्या बाजारातुन घेतली आहे?
आपन माझ्यासाठी एक आणुन द्याल का?"
शास्त्रीजी राजाला म्हणाले,
"महाराज ही पगडी मी विकत घेतली नसुन माझ्या पत्नीने तयार केली आहे."
यावर राजा म्हणाला, तुमची हरकत नसेल तर एक पगड़ी माझ्यासाठी तयार करून आणुन द्याल का? पगडी बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी पुरवतो
शास्त्रीजीनी होकार दिला, सर्व साहित्य घेऊन शास्त्रीजी घरी आले, पत्नीला ते साहित्य देऊन एक पगड़ी राजेसाहेबासाठी बनविण्यास सागितंले काही दिवसात पगड़ी तयार झाली. राजाने पगड़ी ड़ोक्यावर ठेवुन आरशासमोर उभे राहुन बघितले व म्हणाले
शास्त्रीजी पगड़ी अतिशय छान आहे परंतु तुमच्या पगड़ी सारखी झाली नाही...
   शास्त्रीजीने पत्नीला दुसरी पगडी बनविण्यासाठी सांगितले शास्त्रीजीच्या पत्नीने अनेक पगड़ी बनविल्या परंतु प्रत्येक वेळेस राजाची तिचे प्रतिक्रिया येत होती. राजा म्हणाला सर्व साहित्य तर तेच आहे व पगड़ी बनविणारी स्रीही तिच आहे, आणि
बनविणारे हातही तेच आहेत मग असे का होते??? शेवटी राजाने शास्त्रीनां आपल्या पत्नीला दरबारात हजर रहाण्यास सांगितले. राजाने शास्त्रीजीच्या पत्नीला विचारले पगड़ी बनविण्यासाठी लागणारे साहित्यही तेच आहे. व बनविणारे हात ही तेच आहेत
मग शास्त्रीबुवा सारखी पगड़ी का तयार होत नाही मग??? यावर शास्त्रीजीची पत्नी राजाला म्हणाली राजेसाहेब रागाऊ नका मी एक पतिव्रता स्री आहे व माझ्या पतिची पगड़ी बनविताना मी माझ्या ह्रदयातील प्रेमही त्या पगड़ीत ओतलय ते मी तुमची पगडी बनविताना परपुरूषासाठी कुठून आणू...
पतिव्रतेचें हृदय जैसें ।
पतिवांचूनि न स्पर्शे ।
मी सर्वस्व या तैसें ।
सुभटांसी ॥
  कारण, प्रेम हे अनन्य असते एकालंबनात्मक असते, तेथे व्यभिचार रूपी भावही खपत नाही. पतिव्रता स्रीचे हे शब्द ऐकून राजा निरूत्तर झाला. भक्तिमार्गातही हिच एकनिष्ठ प्रेमभक्ती संतमहात्मांनी सांगितली आहे माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत याच एकविध भक्तीच वर्णन करतात
परी तेची भक्ती ऐसी |
पर्जन्याची सुटिका जैसी |
धरावाचुनी अनारिसी |
गतिच नेणे ||
   जगद्गूरू तुकाेबाराय हि अंभगात म्हणतात
एक धरिला चित्ती |
आम्ही रखुमाईचा पती ||
अथवा
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण |
आम्हा नारायण तैशापरी ||
   हे सुद्धा फक्त संतानीच म्हणाव माझ्यासारख्या दररोज नवीन देव बदलणाऱ्यांना तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात
ऐसा अखंड भजन करी |
उगा नोहे क्षणभरी |
अवघेन गांवद्वारी |
अहेव जैसी ||

जय जय मुक्ताई 👏👏👏
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Sunday, 1 October 2017

चक्रवर्ती करी

चक्रवर्ती करी
    मानवी मनाच्या विकासात भाषेच मोठ योगदान आहे. अनेक भाषाचं पिढानपिढ्या चालत आलेल ज्ञान सक्रंमीत करण्यासाठी भाषा हा राजमार्गाला जोङणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.
    भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली.
ती पन एक विशिष्ट भाषेचा आधार घेऊनच
त्याच गीता ग्रंथावर टिका करताना विश्व माऊली ज्ञानोबारायांनी छप्पन भाषेचा गौरव केला.
अंतरीक साधनेने परिपूर्ण ठरलेले तुकोबाराय शब्दप्रभू ठरले. या सर्व ग्रंथाच्या जगतात श्री गीता व त्याच ग्रंथाचा अंलकार असलेली माय ज्ञानेश्वरी
तिच वैभव आगळे वेगळेच आहे .
    वेदाला तरी जातीपातीच बधंण आहे परंतू गीता ज्ञानेश्वरी ही सर्वासाठी आहे. ते गीतेच तत्वज्ञान जर समजून घेतल तर जिवनात पुन्हा दुःखच येनार नाहीत.
कदाचित सकंट येतील पन दुःखदायक मुळीच नसणार.
   ज्ञानेश्वरीच्या वाचनाने साधकाची बौधीक क्षमता वाढते. अशा गीताईच्या बोधाने,
तरी पुढील साधावया कार्यार्थ |
पुर्ण झाला पार्थ ||
   जाणते लोक कर्म सोडतच नाही कधी किंवा कर्मापासून दुर पन जात नाही. फळाची अपेक्षा न करता निष्काम कर्म करत असतात. अगदी लहान बाळाला सुद्धा आई शिकवत असते. कर्म करत जा.
गीता ज्ञानेश्वरीची अजुन एक दुसरी शिकवण आहे
अलिप्त रहा. निर अंहकारी रहा व ममत्वरहीत जिवन जगाव.
अलिप्त विटाळा तुका म्हणे
  अशी ही श्री गीता आणि ज्ञानेश्वरीचे आपन फक्त मनाने कानाने वाचेने सेवक होऊया मग,
 म्हणोनी मने काये वाचा |
जो सेवक होईल इयेचा |
तो स्वानंद साम्राज्याचा |
चक्रवर्ती करी ||
  अशी ही माय ज्ञानेश्वरी...
जयमुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Wednesday, 13 September 2017

मोहळा_मक्षिका_गुंतली_गोडीसी

🌺।। श्री विठ्ठल ।।🌺

#मोहळा_मक्षिका_गुंतली_गोडीसी.....
     आपले साधूसंत आपल्याला देहाला कष्ट द्यायला सांगत नाहीत. नामस्मरणासारखा साधा, सोपा मार्ग ते आपल्याला दाखवतात.
मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी ।
तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥
मग तुज बंधन न घडे सर्वथा ।
रामनाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥
न करी काया क्लेश उपवास पारणें ।
नाम संकीर्तनें कार्यासिद्धी ॥३॥
चोखा म्हणे एकांतीं लोकांतीं नाम जपे श्रीराम ।
तेणें होसी निष्काम इये जनीं ॥४॥

      मधमाशी ही ज्याप्रमाणे मधाच्या मोहळात गुंतून पडते, त्याचप्रमाणे माणसाने नामात गुंतले पाहिजे. मधमाशीला मधाचा गोडवा चाखावासा वाटतो. त्याचप्रमाणे माणसाला नामाची गोडी चाखावीशी वाटली पाहिजे. पन हातात जपमाळ घेऊन नाम जपण्याऐवजी , नामस्मरणाचे प्रदर्शन मांडण्याऐवजी मनातल्या मनात नाम जपावे.
      रामनाम जर माणसाने असे आवडीने घेतले तर आजूबाजूच्या  जगाच्या मोहबंधनातून तो लगेच मुक्त होईल,
    उपवास करणे हे देखील देहाला उगीच कष्ट देणे होय. एक दिवस उपवासाच्या नावाखाली खूप खाणे किंवा अजिबात न खाणे या दोन्ही गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. आदल्या दिवशी गोडधोड खातो. यालाच आपण उपवासाचे पारणे म्हणतो. हे निव्वळ आपल्या जिभेचे चोचले पुरवणे आहे. त्याचा खर्या आध्यात्माशी संबंध नाही. नाम संकीर्तनाने सर्व कार्यसिद्धी होत असेल तर उपवास, पारणे या गोष्टी कराव्यातच कशाला?
   चोखोबाराय म्हणतात की ,जो कोणी एकांती आणि लोकांती रामनाम घेईल, तो निष्काम होईल म्हणजे त्याला कोणतीही इच्छा राहणार नाही.  आपणही उगाच देहाला क्लेश न देता रामनाम घेणे हिताचे ठरेल.

#जय_जय_मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

Sunday, 27 August 2017

*🌺|| श्री विठ्ठल ||🌺*

*न करीं सायासाचें काम.......*

      माऊली ज्ञानोबारायांनी नामस्मरणाचे महत्त्व वारंवार सांगितले, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ईश्‍वरप्राप्तीचा हा सर्वात सोपा आणि शरीराला कुठल्याही पातळीवर कष्ट न देणारा असा सर्वोत्तम भक्तीमार्ग आहे. शास्त्रग्रंथांचे वाचन जरी आयुष्यात झाले नाही, तपश्‍चर्या करणे तर केवळ अशक्यच हे ठाऊक झाल्यामुळे त्या वाटेकडे नजरसुद्धा फिरवली नाही, उपास वा व्रते करणे किंवा तीर्थक्षेत्रांना भेटी देणेसुद्धा जमले नाही तरी जीवाला वाईट वाटायला नको. केवळ अखंडपणे नाम घेतले तरी ईश्‍वराची प्राप्ती होईल असा आशीर्वाद माऊली ज्ञानोबारायांनी सर्व आर्त भक्तांना अनेक वेळेला दिला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात,
*जप तप अनुष्ठान |*
*नित्य आमुचें रामधन |*
*रामकृष्ण नारायण |*
*हाचि जिव्हार सर्वदा ||*

   श्रीरामाच्या वा श्रीविठ्ठलाच्या अत्यंत मधुर नामाचा अष्टौप्रहर उच्चार करणे, ह्या पवित्र नामाचे सतत स्मरण करणे हाच आमचा जप आहे, हीच आमची तपश्‍चर्या आहे. ह्या रामनामासाठी आम्हाला रानावनात जाऊन तपश्‍चर्या करण्याचे अत्यंत कठोर असे व्रत करावे लागत नाही. नामस्मरण हेच आमचे अनुष्ठान. तिच आमच्या आयुष्याची संगती आहे. तेच तर आमचे जीवन आहे. तोच आमचा शाश्‍वत आनंद आहे.
*जयासी अमृत घट |*
*रामकृष्ण घडघडाट |*
*हेचि पूर्वजाची वाट |*
*सर्व जीवाशी तारक ||*
     माऊली ज्ञानोबाराय ह्या नामस्मरणासंबंधी एक विलक्षण असा विचार देतात की, ज्याच्यापाशी हे रामनामाचे अमृताहून गोड असणारे घट आहेत आणि ह्या घटांमधले हे अमृत जे सतत प्राशन करतात त्यांना सहजपणे अमरत्व प्राप्त होते. ज्यांच्या मुखात फक्त परमेश्‍वरी नामाचा आणि विचारांचा गडगडाट आहे ते जीव हा भवसागर निश्‍चितपणे तरून जातील. आपले भाग्यवान पूर्वज ह्याच हरिनामाच्या वाटेवरून मोक्षाच्या दिशेने चालत गेले. म्हणूनच तर माऊली ज्ञानोबाराय आवर्जून सांगतात की, रामकृष्णहरि हा जप सर्व जीवांचा तारक मंत्र आहे.
*गोविंद गोविंद राम |*
*सर्व साधिलें सुगम |*
*न लगे तीं तपें उत्तम |*
*रामकृष्ण पुरे आम्हा ||*
    हा भवसागर तरून जाण्यासाठी केवळ नामस्मरणातच दंग व्हा. सतत परमेश्‍वराच्या नामाचा उच्चार करा. रामकृष्णगोविंद हा नामजप पुरेसा आहे. त्यासाठी तपश्‍चर्या नको की कुठल्याही प्रकारचा यज्ञ करायला नको. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आम्हाला तर केवळ रामकृष्ण नामाचा जयजयकार पुरेसा आहे. केवळ नामोच्चार पुरेसा आहे.
*ज्ञानदेवी स्नान ध्यान |*
*राम राम नारायण |*
*इतुकेंचि पुरे अनुष्ठान |*
*हेचिं जीवन शिवाचें ||*
    माऊली ज्ञानोबाराय सर्व परमभक्तांना अत्यंत प्रेमाने सांगतात की, आम्हाला तर केवळ नामस्मरणाचे अखंड स्नान पुरेसे आहे. नामाच्या पावसात आम्ही चिंब भिजतो. एवढे अनुष्ठान तर आम्हाला खूप झाले. म्हणुनच  संत चोखोबाराय म्हणतात,
*न करीं सायासाचें काम |*
*गाईन नाम आवडीं ||*

संग्रहीत

*जय जय मुक्ताईं*
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
#देवा_तूंचि_गणेशु

       सध्या गणपती उत्सव सुरू आहे. उत्साह, आनंद आणि जल्लोषाचे वातावरण आहे. संत वाङमयात आणि इतरत्रही गणेशाची वर्णने वाचायला मिळतात. सगुण साकार गणेशाला ते ब्रह्म स्वरूप समजतात. गणपती अथर्वशीर्षात म्हटले आहे की, #त्वं_प्रत्यक्षं_ब्रह्मसि |
#सर्वं_जगदिदं_त्वयि_प्रत्येति |

    जग तुझ्यापासून निर्माण झाले. तुझ्या ‌ठिकाणी स्थिर आहे. जग तुझ्यातच लय पावते आणि जगाची प्रतीती तुझ्यात पहायला मिळते. हे विश्वव्यापक वर्णन पाहून अचंबा वाटतो ना?
    गणपतीचे रूप ॐकार स्वरूपाचे आहे असे वर्णन आढळते. ओंकारालाही ब्रह्म म्हटले आहे. एकाक्षरी मंत्र, वेदांमधले ज्ञान सारही म्हटले आहे. ॐ कारा संदर्भात लिहायचे म्हणजे स्वतंत्र लेख होईल. या संपूर्ण विश्वात, ब्रह्मांडात एक तत्त्व आहे, ज्याला चैतन्य, चेतना, ब्रह्मशक्ती, वैश्विक शक्ती वगैरे नावाने संबोधले जाते. म्हणजे एक मुलभूत शक्ती, जिने हे ग्रह तारे आणि ब्रह्मांडाचा पसारा उभा केला. त्या पसाऱ्यात पृथ्वी आणि आपणही आलोच. या मूळ शक्तीचीच रूपे म्हणजे ब्रह्मा, विष्णु, महेश आणि सरस्वती, काली ही होय. याच रूपांचे अनेक देव, देवता मानवाने संकल्पित केल्या आहेत. राम, कृष्ण, श्री दत्त वगैरे देव, देवता ही मूळ शक्तीचीच रूपे कारणपरत्वे निर्माण झाली. माणसात ती सगुण रूपात आपल्या जवळची आपले सख्य असणारी वाटली. परंतु श्रीराम काय किंवा महालक्ष्मी काय किंवा सप्तश्रृंगी देवी काय ही मूळ चैतन्याचीच रूपे आहेत. स्त्री तत्त्व आणि पुरूष तत्त्व ही दोन तत्त्वे संपूर्ण विश्वात आहेत आणि ती दोघेही एकमेकांत समाविष्ट आहेत. म्हणून रामाची उपासना केली, तरी ती अंतिमत: ती मूळ चैतन्य शक्तीची व त्या शक्तीच्या एकरूपतेची साधना आहे. त्यामुळे गणपतीतून त्या मूळ चैतन्य शक्तीचे रूप दिसत असल्याने तो ब्रह्ममय आहे. त्यामुळे शक्तीतून सारा पसारा झाल्यामुळे जग त्याच्यातच पहायला मिळते. म्हणून गणपती म्हणजे परब्रह्म असे विश्वव्यापक रूप संतांना दिसले.
   मग ज्ञानेश्वरांनी #हे_विश्वचि_माझे_घर ही भूमिका का मांडली,
#ॐ_नमोजी_आद्या |
#वेद_प्रतिपाद्या | किंवा
#देवा_तुचि_गणेशु |
#सकळमति_प्रकाशु |
   असे ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना का म्हटलेे ते समजते. 'हे ॐकारा गणेशा आदित्तत्त्व' म्हणजे मूळ तत्त्व असणाऱ्या आणि वेदांनाही प्रतिपादीत केलेल्या तुला वंदन असो, ही विश्वव्यापक भूमिका मांडली आहे.
   हे विश्वच महागणपतीचे रूप आहे असे तुकाराम महाराज देखील म्हणतात,
#रविशशी_तारांगणे_जयामाजी_सहजे | #उदरी_सामावली_जया_ब्रह्मांड_बीजे |
  सूर्य, चंद्र सगळी तारांगणे, अवघे ब्रह्मांड गणरायाच्या विशाल उदरात सामावली आहेत. म्हणजे हा महागणेश ब्रह्मांड विश्वव्यापक आहे कारण ज्या मूळ शक्तीपासून हा गणेश झाला आहे तो गणेश आणि ती शक्ती एकच आहे. त्यामुळेच गणेशाच्या उदरात ब्रह्मांड सामावून जाते. अणूरेणूत जे मूळ तत्त्व आहे तेच संपूर्ण आकाशात आहे. म्हणून अणोरणीया थोकडा तुका आकाशाएवढा ही मूळ तत्त्वाच्या एकरूपतेची अनुभूती ते सांगतात. ती समजून घेतली पाहिजे आणि गणेशाचे विश्वव्यापक रूपही समजून घेतले पाहिजे.
संग्रहीत चिंतन

ज्ञानोबा तुकाराम
जय मुक्ताईं

Monday, 31 July 2017

समय बड़ा बलवान

|| श्री  विठ्ठल ||

समय बड़ा बलवान
   महाभारत युद्ध समाप्त झाले होते. कसांचे सासरे व मित्र, मगध राज्याचे राजे जरासंधाच्या मृत्युनंतर मथुरा नगरीतील लोकांना नुकतेच सुरक्षीत वाटु लागले होते.
परंतु मथुरा नगरीवर काल यवनाची नजर होती
त्यामुळे सर्व मथुरावासीयांना असुरक्षीत वाटु लागले. काल यवन ज्याच्यामुळे कृष्ण भगवंताला मथुरा सोडुन जावे लागले होते व त्यामुळे भगवंताला रनछोड म्हटले जाऊ लागले.
 अशा या काल यवनाला अमरत्वाचे वरदान होते, म्हणुन कृष्ण भगवान व बलराम त्याला मारु शकत नव्हते.
त्यामुळे तो प्रत्येक वेळेला मोठे मोठे सैन्य घेऊन युद्ध करायचा. एकदा कृष्ण भगवान कालयवनाबरोबर  युद्धामध्ये जखमी झाले. ही गोष्ट अर्जुनाला समजली तेव्हा भगवंताला पाहण्यासाठी अर्जुन निघाला, तेव्हा रस्त्यामध्ये नारद मुनी भेटले, अर्जुनाला म्हणाले की,
" अर्जुना कृष्णा ला बघायला जातोय खरे पण त्यांच्या जखमांना हात नको लावु , जखमांना स्पर्श केला तर तुझी शक्ति संपुष्ठात येईल."
    अर्जुनाला प्रश्न पडला त्यातच तो कृष्ण भगवंताजवळ पोहोचला. भगवंतांनी त्याला डोक्याकडील भागाला बसावयास सांगीतले परंतु अर्जुनाने भगवंताचे ऐकले नाही
 अर्जुन भगवंताला म्हणाला
प्रभू
भक्ताची जागा हि भगवंताच्या चरणाजवळ शोभणारी आहे
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,
"ठिक आहे अर्जुना,
चरणाजवळ बसावे परंतु तु माझ्या जखमांना स्पर्श करु नये
 पण तुझ्या बाणाच्या तिराने तर यांना स्पर्शु शकतो."
अर्जुनाला भगवंताचे म्हणने पटले व भगवंताच्या जखमांना पाहण्यासाठी आपल्या धनुष्याचा तीर काढला व जखमांना बाणांचा स्पर्श होताच अर्जुन युद्धासाठी तयार झाला पन भगवंतांनी नाही म्हटले.आणि सांगीतले की काल यवन  हा तुझ्यासाठी धोका होऊ शकतो.
त्याला अंसख्य वरदान प्राप्त आहेत
  भगवंतांनी अर्जुनाला म्हटले की, *" मी आता जखमी आहे उद्या मला पाहण्यासाठी गौळनी येतात. रस्त्यामध्ये त्यांना भिल्लांच्या वस्त्या लागतात , तर तु फक्त ऐवढे कर की त्यांच्यापासुन गौळनींचे रक्षण कर."*
  अर्जुनाने हो म्हटले
 त्याला स्वतःच्या शक्तिवर घमंड  झाले, दुसऱ्या दिवशी गौळणी भगवंताला भेटायला आल्या त्या वेळेस रस्त्यात लुटारुंनी त्यांना घेरले. महाभारतीय युद्धात काही लाखो अक्षोहिनी सैन्याचा ऐकटा पराभव करणारा अर्जुन तीथेच होता परंतु तो काहीच करु शकला नाही.
   धनुष्याचा तीर भगवंताच्या जखमांना लावल्यामुळे तो मंत्र विसरला होता व शक्तिहीन झाला होता.  भिल्ललुटारुंनी गौळनींना लुटले. अर्जुनाला लाज वाटु लागली भगवंतासोबत नजर मिळवायला हिम्मत होत नव्हती. अर्जुनाला कळुन चुकले होते की महाभारत युद्धामध्ये माझ्या शक्तीची नही तर भगवान परमात्माची होती
त्या वेळेची होती.
   या प्रसंगाच तुलसीदासजी वर्णन करतात
तुलसी नर का क्या बडा, समय बडा बलवान |
भीलां लूटी गोपियाँ, वही अर्जुन वही बाण ||

जय जय मुक्ताई 👏👏👏

https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/