˙˙जय मुक्ताई ..

Sunday, 8 October 2017

लागो आगी नावा

लागो आगी नावा

   शरीराचा जन्म होतो म्हणून त्याला मरावच लागत.
कारण हा सृष्टीचा नियमच आहे.
उपजे ते नाशे !
नाशीले ते पुनरपी दिसे !
हे घटिका यंत्र जैसे !
परीभ्रमे गा !!
  जो जन्माला आला तो मरनारच.
जो खाटावर आला तो कधीतरी ताटीवर जाणारच.....
आजा मेला पनजा मेला बाप म्हसना गेला !
देखत देखत नातू पनतू तोही तैसा झाला !!
येथ नाही उरो आले अवतार !
येर ते पामर जिव कीती !!
   मग रङत बसण्या पेक्षा आनंदाने सृष्टीच्या परीवर्तनाची वाट पहावी. आत्मा बदलत नाही, मग चिंता कशाला? उगाच शरीराची उत्पती समजून स्वभाव जानून घेतला पाहिजे.
शरीर जर नाशिवंत स्वभावे मग त्याचे किती लाङ पुरवायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे
नौ भी मर गये दस भी मर गये मर गये जिन्दा जोगी
सगळेच मरनारच आहे,
उदंङची झाले जन्मोनीया मेले !
होउनीया गेले रावरंक !!
त्याचे नाम कोणी नेघे चराचरी
मग आपल्या नावाचाही अट्टाहास कशासाठी.....
तुकाराम महाराज म्हणतात,
क्षण एक तोही नाही विसावा !
लक्ष चौर्याशी घेतल्या धावा !
भोवङंती पाठी लागल्या हावा !
लागो आगी नावा माझ्या मिपना !!
अशा नाशिवंत शरिराकङुनच आनंदाची अपेक्षा करनच मुळात हास्यास्पद आहे. या नाशिवंताचा कशाला अभिमान पाहिजे उगाचच
यापेक्षा तुकोबाराय म्हणतात,
निरंजनी आम्ही बाधियंले घर !
निराकारी निरंतर राहीलोसे !!
  उपदेशापेक्षा आपन स्वताच उपदेशीत होन कधीही चांगले. निराकार भक्ती सोपी नाही पण अवघङही तितकी नाही. साधुसंत तिथेच तर वास्तव करतात म्हणून साधक जिवनात हेच तर अंतिम ध्येय असते.
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment