˙˙जय मुक्ताई ..

Friday, 3 November 2017

जंतूनाम्_नरजन्म_दुर्लभमिदम्

जंतूनाम्_नरजन्म_दुर्लभमिदम्
श्रीविठ्ठल
जगतातील भगवंताची सर्वोत्कृष्ट निर्मिती जर काय असेल तर ती मानव.
आपल्याला मिळालेल अतीशय पवित्र अस मानवी जीवन हे अनेक जन्माच्या सुकृताचे फळ आहे.
अत्यंत दुर्लभ असा मानवजन्म मिळला हा कागताली न्याय आहे.
इतर प्राणी व मानव यात आहार, निद्रा, भय व मैथून आदी गुण समान आहेत
परंतू
पशू काय पाप पुण्य जाणती
यातुलनेत भगवंताने बुद्धी हा एक विशेष गुण मानवात दिला आहे.
मन, बुद्धी, चित्त व अंहकार असलेल अंतकरण मानवाला दिलय.
मानवाला मिळालेली ही नररूपी रत्नाची खाण आहे.
अस अत्यंत दुर्लभ असा देह ज्यात
कृतज्ञता, अस्मिता, भावमयता व कृतीप्रणवता
हे चार विशेष गूण आहेत
असा देवाने दिलेला देहाचा कसा वापर करायचा.
संत महात्मे म्हणतात *मनुष्यपन तरी साधी नारायण*
असा देवाची प्राप्ती करून देनारा मानवी देह देवादिकांना कळाला पन मिळाला नाही.
पशु पक्षांना मानवदेह मिळालाही नाही व कळालाही नाही.
साधु संताना मिळालाही व कळालाही
म्हणून तर ते म्हणतात
मनुष्य देहा ऐसे निध !

साधाल ते साधा सिद्ध !
करूनी प्रबोध !
संत पार उतरले !!

साधुसंत गेले आनंदी राहीले !

 हरिनामे झाले कृतकृत्य !!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

म्हणोनि_कुळ_जाति_वर्ण

म्हणोनि_कुळ_जाति_वर्ण
    महाराष्ट्राच्या_मातीवर_समतेचे आणि ममतेचे जे संस्कार झाले ते वारकरी संप्रदायामुळे आणि पांडुरंग परमात्मा या महनीय दैवतामुळे.म्हणूनच आपण पहातो की,सामान्य माणूस खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन ज्ञानोबा-तुकाराम,विठोबा-रखुमाई आणि या विठ्ठलाचे अभंग गात गात शेकडो मैल जमीन पायी चालत आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येतो.आणि मनोमन सुखावून जातो. #आषाढी कार्तिकी विसरू नका मज।सांगतसे गुज पांडुरंग। असं स्वतः परमात्मा सांगतोय अस संतवचन आहे.असंख्य भक्तांच्या मानसिक सुखाचं हे माहेरघर आहे.वारकरी संप्रदाय हा समता विचारानं भरलेला आहे.संताच्या वाङमयात सुद्धा समतेच्या विचाराला प्राधान्य दिसून येते.एका अर्थान आपण असही म्हणू शकतो की वारकरी संप्रदाय हा समतेची मशाल हाती घेऊन अवघ्या विश्वाच्या अंधारलेल्या मनात प्रकाश पाडीत प्रवास करीत आहे.आणि याचा प्रत्यय हा आषाढी-कार्तिकीच्या वेळी भारतातल्या आणि भारताबाहेरूनही येणारी जी लोकगंगा चंद्रभागेला येऊन मिळते तेव्हा येतो.वारकरी पंथाच्या या महाद्वारातून कोणत्याही जातीचा आणि वर्णाचा भक्त पांडुरंगाची भेट घेऊ शकतो.वारकरी पथांची विचारसरणी विश्वाला महान शिकवण देणारी आहे. हिथे जातीपातीचा नाही तर भक्तीचा विचार होतो.माऊलींची सुंदर ओवी आहे,
म्हणोनि_कुळ_जाति_वर्ण।

हे आघवेचि या अकारण।
एथ अर्जुना माझेपण।
सार्थक एक।
#जयमुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

सत्य_तु_सत्य_तु_सत्य_तु

सत्य_तु_सत्य_तु_सत्य_तु
श्रीविठ्ठल
एका
सत्याचाच सार्‍या विश्वाला आधार असतो.
नित्य एकरस, अविकारी व अधीनाशी असणे हेच सत्याचे लक्षण आहे.
कर्तव्यरूप स्वधर्म पालनाने सत्याची प्राप्ती होऊ शकते.
शम, दम,समता,क्षमा, तितीक्षा ,मत्सराचा अभाव, असूया , त्याग, ईश्वर निष्ट धैर्य व अंहिसा यागुणांच्या योगाने सत्य प्रगट होते.
अशा सत्याचा उदय ज्याच्या अंतकरणात झाला आहे त्यांना प्रचिती आलेली असते
*सत्य तु सत्य तु सत्य तु विठ्ठला*
त्यांच्याकरवी या ईश्वरी जगताच्या अकल्याणाचे कार्य कधीच घङू शकत नाही.
कारण
या परम सत्याला शांतीचे अधिष्ठान असते

अशा
सत्याची प्रभा मगंल असते.
त्यायोगेच त्यांच्या व इतरांच्याही आयुष्याची संध्याकाळही मगंलच होत असते.
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

सुख के माथे सिल परो

🌺|| श्री विठ्ठल ||🌺
सुख के माथे सिल परो,
नाम हृदय से जाये ,
बलिहारी उस दुःख की,
कि पल पल नाम रटाये ।

ऐसे सुख साधन को गोली मारो, जो भागवत नाम का विस्मरण करा दे, पत्थर से सर फोड़ दो ऐसे सुख का. इससे तो दुःख भला जो भगवान का नाम तो मुख से निकलवा देता है।
#जय_जय_मुक्ताईं
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

तुळशी विवाह

तुळशी विवाह
तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत, या सणाची वैशिष्ट्ये, तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, तसेच ‘देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर का करावा ?’, यासंबंधीची माहिती येथे देत आहोत.

१. तिथी
हा विधी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात.

२. पूजन
श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात.

३. वैशिष्ट्ये
तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रतेघेतलेली असतील, त्या सर्वांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील, ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः सेवन करतात.
तुळशी विवाहाच्या दिवशी सायंकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या सूक्ष्मतर लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते. वातावरणातील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो. या लहरींच्या संयोग सोहळ्यालाच तुळशी-विवाह असे म्हणतात. तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाच्या रूपात श्रीविष्णूची पूजा केली जाते. या दोन्ही तत्त्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सायंकाळी तुळशी-विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाहाच्या मुहूर्त कालातच श्रीविष्णु-लक्ष्मी या दोन तत्त्वांच्या लहरींचे आगमन आणि संयोग घडून येत असतो. वातावरणातील या सात्त्विकतेचा फायदा मिळावा, यासाठी तुळशी-विवाह हा मुहूर्त कालातच करावा.

४. तुलसी दर्शनाचे महत्त्व
‘प्रत्येक हिंदूच्या घरी तुळस असायलाच हवी’, असा संकेत आहे. ‘सकाळी आणि सायंकाळी सर्वांनीच तुलसीदर्शन करावे’, असे सांगितले आहे. या तुलसीदर्शनाचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे.
तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥ – तुलसीस्तोत्र, श्‍लोक १५
अर्थ : हे तुलसी, तू लक्ष्मीची मैत्रीण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारदाने स्तवलेल्या आणि नारायणाला प्रिय अशा तुला मी वंदन करतो.

५. तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये
५ अ. पापनाशक : ‘तुलशीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, नमन, पूजन, रोपण आणि सेवन या गोष्टी युगायुगांची पातके नष्ट करतात.
५ आ. पवित्रता : तुलसीचे बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र बनते. या संदर्भात स्कन्दपुराणात (वैष्णवखण्ड, अध्याय ८, श्‍लोक १३ मध्ये) म्हटले आहे,
तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते ।
तद् गृहं तीर्थभूतं हि नायान्ति यमकिङ्कराः ॥
अर्थ : ज्या घरी तुलसीचे वन आहे, ते घर तीर्थासारखे पवित्र होय. त्या घरात यमदूत येत नाहीत.
५ इ. सर्व देवतांचा वास असणे : ‘तुलशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात’, असे सांगितले आहे.
५ ई. श्रीविष्णूला परमप्रिय असणे
१. तुलसी वृंदावनात रहाते. ती श्रीविष्णूला परमप्रिय आहे.
२. तुलसीदलाविना श्रीविष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते. पद्मपुराणात म्हटले आहे की, सुवर्ण, रत्ने आणि मोती यांची फुले श्रीविष्णूला वाहिली, तरी त्यांना तुलसीदलाच्या १६ व्या कलेचीही सर येणार नाही.
३. तुलसीपत्र ठेवल्यावाचून किंवा तुलसीदलाने प्रोक्षण केल्यावाचून श्रीविष्णु नैवेद्य ग्रहण करत नाहीत.
४. कार्तिक मासात (महिन्यात) तुलसीदलाने केलेल्या विष्णुपूजेचे माहात्म्य विशेष आहे.
५. श्रीविष्णु, श्रीकृष्ण किंवा पांडुरंग यांच्या गळ्यात तुळशीचा घवघवीत हार घालतात.
संदर्भ : ‘भारतीय संस्कृतीकोश’, खंड ४, पान क्र. १५५

६. तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा !
देवांचे जलंधर दैत्याशी युद्ध चालू होते. त्या जलंधराची वृंदा नावाची पत्नी पतीव्रता होती. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे देवांकडून जलंधर दैत्याचा वध होत नव्हता. श्रीविष्णूने जलंधराचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. त्याच वेळी श्रीविष्णूने वृंदेच्या पातिव्रत्यावर प्रसन्न होऊन तिला वर दिला, ‘वृंदा, तू तुळस होऊन सर्वांना वंदनीय होशील. तुझ्या तुलसीपत्राने भक्त माझी पूजा करतील. तसेच प्रतिवर्षी कार्तिक मासात तुझा विवाह माझ्याशी लावण्यात येईल.’ भगवान श्रीकृष्ण हा श्रीविष्णूचा पूर्णावतार आहे. त्यामुळे प्रतिवर्षी कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावतात.

७. देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानाचा वापर का करावा ?
देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोचणे, सात्त्विक होणे आणि त्याच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता न्यून होणे
७ अ. तुळशीचे वैशिष्ट्य : तुळस ही वनस्पती वायूमंडलातील सात्त्विकता खेचण्यात आणि ती प्रभावीपणे जिवाकडे प्रक्षेपित करण्यात अग्रेसर आहे. ब्रह्मांडातील श्रीकृष्णतत्त्व खेचून घेण्याची क्षमताही तुळशीत अधिक असते.
७ आ. लाभ
१. तुळशीच्या पानाने नैवेद्य दाखवल्याने सात्त्विक अन्नातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म-लहरी तुळशीच्या पानाकडून ग्रहण केल्या जातात. असे सूक्ष्म-लहरींनी युक्त पान नंतर देवाला अर्पण केल्यामुळे देवतेच्या तत्त्वाकडून त्या लहरी पटकन ग्रहण केल्या जातात. अशा प्रकारे आपण अर्पण केलेले अन्न तुळशीच्या पानांच्या माध्यमातून देवतेपर्यंत लवकर पोचून देवता लवकर संतुष्ट होण्यास साहाय्य होते.
२. अन्नावर आलेले रज-तम कणांचे आवरण तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे न्यून (कमी) होते. तुळशीदलातून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे नैवेद्याभोवतीचे वायूमंडल शुद्ध झाल्याने नैवेद्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यताही न्यून होते.
३. नैवेद्यावर भावपूर्णरित्या तुळशीदल ठेवल्याने ते त्याच्या उपजत गुणधर्माप्रमाणे देवतेकडून येणारे चैतन्य ग्रहण करून प्रभावीपणे नैवेद्याकडे संक्रमित करते. नंतर अशा नैवेद्याच्या सेवनाने जिवाच्या देहाला चैतन्यलहरी मिळण्यास साहाय्य होते.’
व्हॅटसप सौजन्याने
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

तव_तु_हरिगुण_गाय

#तव_तु_हरिगुण_गाय
श्रीविठ्ठल
मरन केव्हा येईल हे कुनालाच सागंता येणार नाही.
मृत्यूचे प्रभुत्व सर्व जगतावर आहे.
मासे पकङनारे लोक माशांना सुचना थोङेच देतात अगोदर
त्यांना वाटेल तेव्हा ते आपले जाळे टाकतात.
तसे काळाच्या कधी मनात येईल सांगता नाही येत.
जेव्हा काळाच्या मनात येईल तेव्हा आपली वेळ भरली असे समजावे.
घङी घङी काळ वाटच पहात असतो.
जिवाला पुर्वसुचना देण्याचे बधंन काळावर थोङेच आहे.
यासाठी तारूण्यात असताना धर्माचरणासाठी वृद्धपनिची वाट पहान शहानपणाच कस ठरेल?
याकरीता संतमहात्मे म्हणतात
जव काळ असे दुरी ठेला !

तव तु हरिगुण गाय ऐक वहीला !!
जयमुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/